AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाच्या प्रस्तावित भगव्या जर्सीला अबू आझमींचा विरोध

टीम इंडियाच्या प्रस्तावित भगव्या जर्शीवरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी भगव्या जर्शीवर आक्षेप घेत मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.

टीम इंडियाच्या प्रस्तावित भगव्या जर्सीला अबू आझमींचा विरोध
| Updated on: Jun 26, 2019 | 3:49 PM
Share

मुंबई : टीम इंडियाच्या प्रस्तावित भगव्या जर्सीवरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी भगव्या जर्सीवर आक्षेप घेत मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ भगवी जर्सी घालून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. दोन्ही संघाच्या जर्शीचे रंग सारखेच असल्याने भारतीय संघाकडे भगव्या जर्सीचा पर्याय आहे. मात्र त्याला अबू आझमी यांनी आक्षेप घेतला आहे.

“मोदींना संपूर्ण देशाचं भगवीकरण करायचं आहे. मात्र त्यांनी लक्षात ठेवायला हवं की तिरंग्यामध्ये मुस्लिमांचा हिरवा रंगही आहे. अन्य रंगही तिरंग्यात आहेत, मग जर्सीसाठी केवळ भगव्या रंगालाच पसंती का? भारतीय संघाची जर्शी जर तिरंग्यात असेल तर ते उत्तम ठरेल”, असं अबू आझमी म्हणाले.

अबू आझमींचा हल्लाबोल

मोदी सरकार देशाचं भगवीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. देशाचा विकास नाही, बेरोजगारी वाढत आहे. डॉलरचा भाव वाढत आहे, महागाई वाढत आहे. मात्र भारताच्या क्रिकेट संघाला भगवा रंग दिला जात आहे.  त्याला तिरंग्याचा रंग द्यावयाला हवा, असं अबू आझमींनी नमूद केलं.

मुस्लिम कब्रस्तानावरुन वाद

नवी मंबई घणसोली येथील मुस्लिम कब्रस्तानात मुस्लिम बांधव त्यांच्या नातेवाईकांचा दफनविधी करण्यासाठी गेले असता, तिथल्या स्थानिक रहिवाशांनी दफनविधी करण्यास विरोध केल्याचं अबू आझमी म्हणाले.

“ही कब्रस्तानाची जागा शासनाने 11 वर्षापूर्वी मुस्लिम समाजाला दिली आहे. पण ज्यांच्या डोळ्यात मुसलमान खुपतो, अशा मुस्लिमविरोधी समाजकंटकांनी  कब्रस्तानात घुसून दफन करण्यास मनाई केली. इतकंच नाही तर मुसलमान पाकिस्तान मे चले जाव ! यहा दफनाने नही देंगे! अशा घोषणाही दिल्या. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करुन शांतता निर्माण केली”, असं अबू आझमी म्हणाले.

ही मुसलमान समाजाबाबत असलेली व्देषभावना आहे. यामुळे देशाची शांतता भंग केली जात आहे. आज विधानसभा सभागृहात मी औचित्याच्या मुद्याव्दारे हा प्रश्न उपस्थित केला, असं अबू आझमींनी सांगितलं.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेला हा धर्मनिरपेक्ष देश आहे. सरकारने 11 वर्षापूर्वीच जागा दिली असतानाही आता दफनविधी करण्यास विरोध का ? या ठिकाणी पूर्वी मंदिर होते असा स्थानिकांचा दावा आहे. मग या गोष्टीचा विचार सरकारने जागा देताना का केला नाही? 11 वर्षापूर्वी स्थानिकांनी याला विरोध का केला नाही. या सर्वांचे भान ठेवून मुस्लिम समाजाला दफनविधी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अबू आझमी यांनी केली.

संबंधित बातम्या 

World Cup 2019 : ‘मेन इन ब्लू’ आता भगव्या रंगात?  

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.