AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी लोकल, आता कारने 10 तासात 700 किमी प्रवास, शार्दूल ठाकूरच्या जिद्दीला सलाम!

बीसीसीआयने शार्दूल ठाकूरला (Shardul Thakur) रिलीज केल्यानंतर तो देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यासाठी रवाना झाला.

आधी लोकल, आता कारने 10 तासात 700 किमी प्रवास, शार्दूल ठाकूरच्या जिद्दीला सलाम!
जेव्हा शार्दूल ठाकूरने मुंबई लोकलमधून प्रवास केला होता..
| Updated on: Feb 24, 2021 | 4:18 PM
Share

अहमदाबाद : ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्धच्या कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजयात, मोलाचा वाटा उचलणाऱ्या पालघरच्या शार्दूल ठाकूरला (Shardul Thakur) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्थान मिळालेलं नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत उमेश यादवला दुखापत झाल्यामुळे शार्दूल ठाकूरला संधी मिळाली होती. त्यावेळी त्याने संधीचं सोनं केलं. मात्र इंग्लंडविरुद्ध (India vs England 3rd test match, ) त्याला संधीच मिळाली नाही. बीसीसीआयने शार्दूल ठाकूरला रिलीज केल्यानंतर तो देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यासाठी रवाना झाला. (Shardul Thakur travelled for 10 hours to play the Vijay Hazare Trophy)

महत्त्वाचं म्हणजे मुंबई संघाकडून खेळणाऱ्या शार्दूल ठाकूरने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यासाठी 10 तास रस्तेमार्गाने प्रवास केला. शार्दूल ठाकूर अहमदाबादवरुन राजस्थानला कारने रवाना झाला. त्याने तब्बल 700 किमीचा प्रवास केला.

BCCI च्या माहितीनुसार, उमेश यादवने (Umesh Yadav) ने रविवारी अहमदाबादमध्ये फिटनेस टेस्ट पास केली. त्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या उर्वरीत दोन कसोटी सामन्यांसाठी संधी देण्यात आली. त्यामुळे शार्दूल ठाकूरला विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी रिलीज करण्यात आलं.

शार्दूल ठाकूर देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईच्या संघाकडून खेळतो. मात्र भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीपूर्वी म्हणजे सोमवारी 22 तारखेलाच त्याला रिलीज करण्यात आलं. मुंबईचा संघ सध्या जयपूरमध्ये आहे. बीसीसीआयने त्याला रिलीज केल्याने, तो तातडीने जयपूरला रवाना झाला. शार्दूलचं क्रिकेटप्रेम सर्वांना परिचीत आहे. त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली.

क्वारंटाईन टाळण्यासाठी 700 किमी रस्तेमार्गे प्रवास 

दरम्यान, शार्दूल ठाकूर अहमदाबादवरुन जयपूरपर्यंत 700 किमी रस्ते मार्गाने गेला. त्यासाठी त्याला जवळपास 10 तास लागले. जर त्याने हा प्रवास विमानाने केला असता तर तो केवळ 80 मिनिटात जयपूरला पोहोचला असता. मात्र तिथे त्याला तीन दिवस क्वारंटाईन राहावं लागलं असतं. त्यामुळेच शार्दूल ठाकूर कारने जयपूरला गेला.

टाईम्स ऑफ इंडियाला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, “शार्दूल ठाकूर 22 तारखेला पहाटे पाच वाजता कारने जयपूरकडे रवाना झाला. शार्दूलचा हा निर्णय पाहून आम्हीही अवाक झाला. जर तो फ्लाईटने आला असता, तर त्याला क्वारंटाईन व्हावं लागलं असतं, मात्र त्याचं क्रिकेटवर किती प्रेम आहे हे त्याच्या कृतीतून दिसतं”

दरम्यान, विजय हजारो ट्रॉफीमध्ये 25 फेब्रुवारीला मुंबईचा सामना पुद्दुचेरीविरोधात होत आहे. मुंबई संघाचं नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. या शिवाय या संघात पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, धवल कुलकर्णी, अखिल हेरवाडकर, सरफराज खान यासारखे तगडे खेळाडू आहेत.

… तेव्हा शार्दूल ठाकूरचा मुंबई लोकलने प्रवास

मार्च 2018 मध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेचा दौरा करुन मायदेशी परतली होती. त्यावेळी शार्दूल ठाकूर हा भारताच्या वन डे आणि टी 20 संघात होता. शार्दूल ठाकूरने ही मालिका गाजवली होती. शार्दूलला एक वनडे आणि दोन टी 20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. वन डे सामन्यात त्याने 4 विकेट्स घेतल्या होत्या. तर दोन टी 20 सामन्यात त्याने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या होत्या.

आफ्रिकेतील धडाकेबाज कामगिरीनंतर शार्दूल ठाकूर टीम इंडियासह मायदेशी परतला. शार्दूल मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर, तिथून थेट अंधेरी रेल्वे स्टेशनवर गेला. अंधेरी स्टेशनवर पालघरचं तिकीट काढून तो लोकल ट्रेनने घरी गेला. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या BCCI चा खेळाडू लोकल रेल्वेने घरी गेल्यानंतर, त्याची जगभरात चर्चा होती. कोणताही बडेजाव न दाखवता शार्दूल ठाकूरच्या साधेपणावर कौतुकांचा वर्षाव झाला होता.

पालघर ते चर्चगेट, शार्दूलचा लोकल प्रवास

शार्दूल ठाकूर हा पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील माहिम-केळवे या गावचा आहे. क्रिकेट हे शार्दूल ठाकूरसाठी जीव की प्राण. त्यामुळेच पालघरच्या या पठ्ठ्याने प्रचंड कष्टाने टीम इंडियाचं दार ठोठावलं. नुकतं दार ठोठावलंच नाही तर जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा तेव्हा धडाकेबाज कामगिरीकरुन माहिम केळवे गावाची दखल ‘गुगल मॅप’लाही घ्यायला लावली. क्रिकेटच्या सरावासाठी शार्दूल ठाकूर दररोज पालघर ते चर्चगेट असा जवळपास अडीच तीन तासांचा प्रवास करायचा.

(Shardul Thakur travelled for 10 hours to play the Vijay Hazare Trophy)

संबंधित बातम्या  

आधी मुंबई लोकलमधून पालघरला परतला, आता शार्दूल ठाकूर मुंबई विमानतळावरुन कुठे गेला?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.