AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचे खापर थेट या 3 खेळाडूंवर, सूर्यकुमार यादव याने थेट म्हटले, कधीही…

T-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताची सुरूवात धमाकेदार पद्धतीने झाली. मात्र, नुकताच भारतीय क्रिकेट संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव नक्कीच जिव्हारी लागणारा आहे. नेमकी चूक कुठे झाली हे सूर्यकुमार यादव याने नुकताच सांगितले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचे खापर थेट या 3 खेळाडूंवर, सूर्यकुमार यादव याने थेट म्हटले, कधीही...
suryakumar yadav
| Updated on: Feb 23, 2026 | 9:01 AM
Share

टीम इंडियाला आयसीसी T-20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भारताला नरेंद्र मोदी मैदानात हा पराभव स्वीकारावा लागला. टी 20 विश्वचषक सुपर 8 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 76 धावांनी पराभव केला. भारताने 11 सामने जिंकली पण हा भारताचा मोठा पराभव आहे. अहमदाबादमध्ये खेळलेला हा सामना भारतासाठी नक्कीच मोठा धक्का म्हणावा लागेल. भारताला आता झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धचे उर्वरित सुपर 8 सामने जिंकावे लागतील, त्याशिवाय भारताकडे दुसरा काहीच पर्याय नसणार आहे. पुढचा सामना चेन्नईमध्ये खेळला जाईल आणि हा सामना भारतासाठी अत्यंत महत्वाचा असेल, त्यावरूनच भारताचे भविष्य ठरले जाईल. दक्षिण आफ्रिकेने आपली विजयाची घोडदाैड कायम ठेवली. त्यांचा अजून एक विजय आणि त्यांचा पुढचा मार्ग अजून सोपा होईल.

सूर्यकुमार यादव याने या पराभवानंतर मोठे विधान केले. सूर्यकुमार यादव याने म्हटले की, संघाला आता तेच करावे लागेल जे सर्वोत्तम आहे. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि चांगली फिल्डिंग. पुढे बोलताना सुर्यकुमार यादव याने म्हटले की, टीम कोणत्याच परिस्थितीमध्ये आपल्या खेळावर परिणाम होऊ देणार नाही आणि त्याच आक्रमतेने खेळेल. 187 चे टार्गेट पूर्ण करताना संघाने पावरप्लेमध्ये 3 विकेट गमावल्या आणि तिथेच घात झाला.

सूर्यकुमार यादव याने हे मान्य केले की, 187 चे टार्गेट पूर्ण करताना संघाने 3 विकेट गमावल्या आणि तिथेच चूक झाली. सूर्यकुमार यादव याने म्हटले की, 180 + धावांचा पाठलाग करताना पॉवरप्लेमध्ये सामना जिंकता येत नाही पण तो सामना आपण हारू नक्की शकतो. पॉवरप्लेमध्ये विकेट गमावल्याने भारताला मोठा फटका बसल्याचे यावरून स्पष्ट आहे आणि सूर्यकुमार यादव यानेही हे मान्य केले.

सुरूवातीला झटपट विकेट गेल्याने सामन्यात एक मोठी भागीदारी बनू शकली नाही. सूर्यकुमार यादव याने बोलताना पुढे म्हटले की, हा पराभव झटका नाही तर एक शिकवण आहे. चुकांवर टीम काम करेल. पण कोणताही मोठा निर्णय घेतला जाणार नाही. आता रीसेट मोडमध्ये असून संघाचे ध्येय स्पष्ट आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये उपांत्य फेरीतील स्थान मिळवायचे आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?