AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहलीच्या नेतृत्वात इंग्रजांच्या भूमीत इतिहास घडणार, 89 वर्षांमध्ये न झालेली गोष्ट टीम इंडिया करुन दाखवणार

टीम इंडिया पुढील महिन्यात न्यूझीलंड विरोधात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल खेळणार आहे. World test Championship final

विराट कोहलीच्या नेतृत्वात इंग्रजांच्या भूमीत इतिहास घडणार, 89 वर्षांमध्ये न झालेली गोष्ट टीम इंडिया करुन दाखवणार
team india
| Updated on: May 17, 2021 | 6:17 PM
Share

नवी दिल्ली: विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया पुढील महिन्यात न्यूझीलंड विरोधात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल खेळणार आहे. हा सामना इंग्लंडमझील साऊथम्पटनमध्ये होईल. ज्यावेळी टीम इंडीया हा सामना खेळण्यासाठी मैदानावर अतरेल तो दिवस भारताच्या 89 वर्षांच्या कसोटी इतिहासातील ऐतिहासिक क्षण असेल. कारण, भारतानं आतापर्यंत त्रयस्थ ठिकाणी एकही सामना खेळलेला नाही. आयसीसीनं टेस्ट क्रिकेटसाठी मान्यता दिलेल्या 12 देशांपैकी केवळ 2 देशांनी आतापर्यंत त्रयस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळलेला नाही. (Team India will play 1st test in history of 89 years on neutral venue at England against New Zealand World test Championship final)

भारताजवळ त्रयस्थ ठिकाणी खेळण्याची संधी होती

भारताकडे 1999 मध्ये त्रयस्थ ठिकाणी टेस्ट मॅच खेळण्याची संधी आली होती. मात्र, त्यावेळी टीम इंडिया आशियाई टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचू शकली नाही. आशियाई टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये बांग्लादेशातील ढाकामध्ये खेळवली गेली होती.

भारत त्रयस्थ ठिकाणी  पहिली मॅच खेळणार

भारत आणि बांग्लादेशनं आतापर्यंत एकही मॅच त्रयस्थ ठिकाणी खेळली नाही. आयसीसीनं कसोटी मॅच खेळण्यास मान्यता दिलेल्या बारा टीम पैकी भारत आणि बांग्लादेश वगळता इतर देशांनी त्रयस्थ ठिकाणी टेस्ट मॅच खेळल्या आहेत.या मध्ये सर्वाधिक मॅच पाकिस्तान त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियानं खेळल्या आहेत. पाकिस्ताननं 39, ऑस्ट्रेलिया 12, श्रीलंका 9 , दक्षिण आफ्रिका 7, न्यूझीलंड वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांनी 6 टेस्ट मॅच त्रयस्थ ठिकाणी खेळल्या आहेत.अफगाणिस्ताननं चार मॅच त्रयस्थ ठिकाणी खेळल्या आहेत.

जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 18 ते 23 जून, साउथ्मपटन

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. तर केएल राहुल आणि वृद्धिमान साहा या दोघांना त्यांच्या प्रकृतीत सुधार झाल्यास संधी मिळेल

संबंधित बातम्या:

ICC World Test Championship Final | आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 फायनल आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

PHOTO | बॅटिंगने गोलंदाजांना शॉक दिला, वर्ल्ड कप विजयाचा हिरो ठरला, टीम इंडियाच्या इलेक्ट्रिकल इंजीनियरची गोष्ट

(Team India will play 1st test in history of 89 years on neutral venue at england against New Zealand World test Championship final)

Follow Us
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.