AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Under-19 World Cup : पाकिस्तानकडे दोन, ऑस्ट्रेलियाकडे तीन वेळा, टीम इंडियाकडे किती वेळा विजेतेपद?

अंडर 19 विश्वचषक स्पर्धेचं सर्वाधिक विजेतेपद भारताकडे आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या नावे या रेकॉर्डची नोंद झाली (Under-19 World Cup Winner) आहे.

Under-19 World Cup : पाकिस्तानकडे दोन, ऑस्ट्रेलियाकडे तीन वेळा, टीम इंडियाकडे किती वेळा विजेतेपद?
| Updated on: Feb 10, 2020 | 12:04 AM
Share

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात बांगलादेशने भारतावर 3 गडी राखत मात (Under-19 World Cup Winner) केली. यामुळे पहिल्यांदाच बांगलादेशने 19 वर्षाखालील विश्वचषकावर नाव कोरलं. भारताने विजयासाठी दिलेलं 177 धावांचं आव्हान बांग्लादेशने 3 गडी राखत पूर्ण केलं. अंतिम टप्प्यात टीम इंडियाने हा सामना गमावल्याने भारताची पाचव्यांदा विश्वविजेतेपदाची संधी हुकली. असं असलं तरी अंडर 19 विश्वचषक स्पर्धेचं सर्वाधिक विजेतेपद भारताकडे आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या नावे या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेला 1988 मध्ये सुरुवात ऑस्ट्रेलियामध्ये झाली. दर दोन वर्षांनी विश्वचषकाची स्पर्धा खेळवली जाते. विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी ऑस्ट्रेलियाने विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. त्यानतंर 1998 मध्ये इंग्लंड विश्वचषक स्पर्धेचा विजेता ठरला होता.

या स्पर्धेतील सर्वाधिक विजेतेपद हे भारताकडे आहे. 2000 मध्ये श्रीलंकेत खेळवण्यात आलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने पहिल्यांदा 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा जिंकली. श्रीलंकेला त्यांच्याच होम ग्राऊंडवर पराभव करत भारताने पहिल्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं. त्यानंतर तब्बल 7 वर्षांनी 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर मात करत भारत पुन्हा एकदा विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदाचा मानकरी (Under-19 World Cup Winner) ठरला.

त्यानंतर 2012 आणि 2018 या दोन्ही वर्षांमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत 19 वर्षाखालील विश्वचषकावर नाव कोरलं होतं. तर दुसरीकडे 2006, 2016, 2020 या तिन्ही वर्षांमध्ये टीम इंडिया उपविजेता ठरली आहे.

दरम्यान 19 वर्षाखालील विश्वचषकाचं सर्वाधिक विजेतेपद हे भारताकडे आहे. तर ऑस्ट्रेलियानेही ही स्पर्धा 1988, 2002, 2010 अशा तीन वेळा जिंकली आहे. तर पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्ताननेही 2004, 2006 असे दोन वेळा विश्वचषकावर नाव कोरलं (Under-19 World Cup Winner) आहे.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...