AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केएल राहुलच्या निवडीवरुन वेंकटेश प्रसाद भडकला, म्हणाला “निवड म्हणजे…”

बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने जबरदस्त कामगिरी करुनही माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसादनं नाराजी व्यक्त केली आहे. केएल राहुलच्या प्रदर्शनावरून त्याने निवड समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.तसेच संघात स्थान दिल्याने चांगलाच संतापला आहे.

केएल राहुलच्या निवडीवरुन वेंकटेश प्रसाद भडकला, म्हणाला निवड म्हणजे...
माजी क्रिकेटपटू मूग गिळून गप्प का? केएल राहुलच्या परफॉर्मन्सवर वेंकटेश प्रसादचं प्रश्नचिन्ह
| Updated on: Feb 13, 2023 | 12:49 AM
Share

मुंबई: भारतीय संघातील सलामीचा फलंदाज गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममधून जात आहे.मागच्या काही सामन्यातील त्याची कामगिरी पाहून माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसादनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यातही केएल राहुल साजेशी कामगिरी करु शकलेला नाही. 71 चेंडूत 20 धावांची खेळी करून तंबूत परतला. त्यामुळे त्याच्या निवडीवरून वेंकटेश प्रसादनं ताशेरे ओढले आहेत. भारतात इतके गुणवंत खेळाडू असताना ही निवड कशाच्या आधारावर केली असा प्रश्न देखील उपस्थित केला. त्याचबरोबर माजी खेळाडू मूग गिळून गप्प असल्याने संताप व्यक्त केला आहे. वेंकटेश प्रसादनं एका मागोमाग एक असे तीन ट्वीट करत गंभीर आरोप केले आहेत.

“मला केएल राहुलच्या टॅलेंट आणि क्षमतेबद्दल खूप आदर आहे. पंरतु त्याची कामगिरी सध्या तरी खेळाला साजेशी नाही. 46 कसोटी सामने खेळलेल्या केएल राहुलची फलंदाजी सरासरी 34 इतकी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 वर्षांहून अधिक काळ खूपच आहे.त्याला इतक्या संधी दिल्या की त्याचा आपण विचार करू शकत नाही.राहुलची निवड कामगिरीच्या आधारावर नसून पक्षपातावर आधारित आहे.गेल्या 8 वर्षात काहीच करू शकला नाही. इतकं असूनही माजी क्रिकेटपटू मूग गिळून गप्प आहे आहेत.”, असं मत परखडपणे माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसादनं ट्विटरवर मांडलं. “काही लोकांना अजूनही संधी मिळालेली नाही. चांगल्या फॉर्मात असताना अनेक खेळाडू प्रतीक्षेत आहेत. शुभमन गिल चांगल्या फॉर्मात आहे. सरफराज फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे या खेळाडूंचा केएल राहुल ऐवजी संधी मिळायला हवी. राहुलच्या कित्येक पटीने मयंक अग्रवाल आणि हनुमा विहारी चांगले आहेत.”, असंही वेंकटेश प्रसादनं पुढे सांगितलं.

वाईट म्हणजे केएल राहुल उपकर्णधार आहे!

“सर्वात वाईट गोष्ट म्हणजे केएल राहुलला उपकर्णधारपद दिलं आहे. खरं तर आर. अश्विनला उपकर्णधारपद देणं गरजेचं होतं. कारण त्याला क्रिकेटची चांगली समज आहे आणि डोकंही..अश्विनला शक्य नसतं तर पुजारा, जडेजाला हे पद दिलं पाहीजे होतं.”, असंही वेंकटेश प्रसादनं पुढे सांगितलं.बॉर्डर गावसकर कसोटी मालिका भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची आहे. ही मालिका भारताने 3-0 ने जिंकल्यास अंतिम फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. सध्या भारताने पहिल्या कसोटी विजयानंतर 1-0 ने आघाडी घेतली आहे.

केएल राहुलची कसोटी क्रिकेट कारकिर्द

केएल राहुल आतापर्यंत 46 कसोटी सामने खेळला असून त्यात 79 सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली. केएल राहुलने 7 शतकं आणि 13 अर्धशतकांच्या जोरावर 2624 धावा केल्या आहेत. कसोटीत 199 ही खेळी सर्वोत्तम ठरली आहे. त्याची फलंदाजी सरासरी 34.07 इतकी आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच