AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Eng : …म्हणून भारताचा पराभव झाला, वीरेंद्र सेहवागने सांगितलं नेमकं ‘कारण’!

भारताचा पराभव नेमका का झाला, याचं विश्लेषण करताना वीरेंद्र सेहवागने नेमकं 'कारण' सांगितलं आहे. Virendra Sehwag

Ind vs Eng : ...म्हणून भारताचा पराभव झाला, वीरेंद्र सेहवागने सांगितलं नेमकं 'कारण'!
वीरेंद्र सेहवाग
| Updated on: Mar 27, 2021 | 1:54 PM
Share

पुणे : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या इंग्लंडने भारताला (Ind vs England 2nd ODI) 6 विकेट्सने पराभवाची धूळ चारली. के.एल. राहुलच्या (K L Rahul) धमाकेदार शतकावर जॉनी बेअरस्टो (jonny bairstow) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) यांनी पाणी फेरलं. जॉनी बेअरस्टोने 124 धावांची खेळी केली तर स्टोक्सने 99 धावा फटकावताना 10 षटकार लगावले. इंग्लंडने हा सामना अतिशय सहज जिंकला. भारताला 336 धावा करुनही सामना गमवावा लागला. भारताचा पराभव नेमका का झाला, याचं विश्लेषण करताना भारताचा विस्फोटक माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) नेमकं ‘कारण’ सांगितलं आहे. (Virendra Sehwag Statement On Why india Lost 2nd ODI Match Against England)

वीरेंद्र सेहवागकडून भारताच्या पराभवाचं विश्लेषण…

‘क्रिकबज’शी बोलताना वीरेंद्र सेहवागने भारताच्या पराभवाचं विश्लेषण केलं. तो म्हणाला, “भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या फिरकीपटूंना (स्पिनर्सना) त्यांच्या पूर्ण ओव्हर्स टाकू दिल्या. स्पिनर्सविरोधात विरोधात आक्रमक बॅटिंग करण्याची गरज असताना भारतीय बॅट्समन त्यांच्याविरोधात शांत खेळले. जर मोईन अली आणि आदिल रशीदविरोधात भारतीय फलंदाजांनी आक्रमक फटके मारले असते तर भारत आणखी 20 ते 25 रन्स जोडू शकला असता. म्हणजेच भारताच्या जवळपास 360 धावा झाल्या असत्या. या लक्ष्याचा पाठलाग करणं इंग्लंडला नक्कीच सोपं नव्हतं”

पुढे बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “इंग्लंडच्या फलंदाजांनी भारताच्या फिरकीपटूंवर आक्रमण केलं. बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टोने भारतीय फिरकीपटूंच्या बोलिंगच्या चिंधड्या उडवल्या. त्यांनी भारतीय फिरकीपटूंना अजिबातच सेट होऊ दिलं नाही. पहिल्या बॉलपासून त्यांनी भारतीय स्पिनर्सविरोधात आक्रमणाची भूमिका ठेवली, त्याच कारणास्तव इंग्लंडला भारतावर पलटवार करणं शक्य झालं.”

कुलदीप यादव आणि क्रुणाल पांड्याने धावांची खिरापत वाटली

टीम इंडियाच्या बोलर्सची खराब बोलिंग भारताच्या पराभवाला जबाबदार ठरली. भारतीय बॅट्समननी धावांचा डोंगर उभा करुन दिलेला असतानाही बोलर्सचा विशाल धावाही वाचवता आल्या नाही. फिरकीपटू कुलदीप यादव आणि क्रुणाल पांड्याने तर अक्षरश: धावांची खिरापत वाटली. क्रुणालने 6 ओव्हरमध्ये तब्बल 72 रन्स दिले. 12 हा त्याचा इकोनॉमी रेट होता. 72 धावांच्या बदल्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.

(Virendra Sehwag Statement On Why india Lost 2nd ODI Match Against England)

हे ही वाचा :

Ind vs Eng : के.एल राहुल ‘शेर’ तर स्टोक्स-बेअरस्टो ‘सव्वाशेर’, टीम इंडियाच्या पराभवाचे दोन व्हिलन

KL Rahul : दोन्ही डोळे बंद, हात कानाला, के एल राहुलच्या शतकी सेलिब्रेशनचा अर्थ काय? ‘राज की बात’ त्याच्याकडून…

Video : सॅम करनने भडकवलं, हार्दिक करनच्या मागे पळाला, अंपायर्सने थांबवलं, पाहा मैदानात काय काय घडलं…?

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.