AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : सीरीज जिंकण्याच्या मार्गावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या कोचच टीम इंडियाबद्दल वादग्रस्त वक्तव्य, नको ते बोलले

IND vs SA : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सीरीजमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. आज टेस्ट मॅचचा शेवटचा दिवस आहे. दक्षिण आफ्रिका कसोटीसह मालिका जिंकण्याच्या स्थितीमध्ये आहे. या दरम्यान दक्षिण आफ्रिकेचे कोच शुकरी कॉनराड यांनी टीम इंडियाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

IND vs SA : सीरीज जिंकण्याच्या मार्गावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या कोचच टीम इंडियाबद्दल वादग्रस्त वक्तव्य, नको ते बोलले
KL Rahul-HarmerImage Credit source: PTI
| Updated on: Nov 26, 2025 | 8:23 AM
Share

India vs South Africa 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडिअमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. टीम इंडियाची अवस्था नाजूक आहे. भारताला विजयासाठी अजून 522 धावांची गरज आहे. एक दिवसांचा खेळ बाकी असून टीम इंडियाच्या 8 विकेट शिल्लक आहेत. हा कसोटी सामना जिंकणं टीम इंडियासाठी जवळपास अशक्यच आहे. भारताने ही कसोटी जिंकली तर तो मोठा चमत्कार ठरेल. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. सामन्यासह मालिका गमावण्याचं भारतीय टीम समोर संकट आहे. गवाहाटीच्या या पीचवर भारतीय फलंदाज एकदिवसही टिकून फलंदाजी करु शकलेले नाहीत. तेच दक्षिण आफ्रिकेच्या टीमने पाच पैकी चार दिवस फलंदाजी केली. पहिल्या इनिंगमध्ये दोन दिवस दक्षिण आफ्रिकन टीमने फलंदाजी केली. तिसऱ्या दिवशी अखेरच्या सेशनमध्ये टीम इंडिया ऑलआऊट झाली.

तिसऱ्या दिवशी शेवटच्या आठ ओव्हर दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी केली. चौथ्या दिवशी आफ्रिकेने दुसऱ्या डावात दोन सेशनमध्ये फलंदाजी केली. अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेच्या टीमने चार दिवस बॅटिंग केली आहे. दक्षिण आफ्रिकन टीमचे कोच शुकरी कॉनराड यांनी चौथ्या दिवशी खेळ संपल्यानंतर एक धक्कादायक विधान केलं. “भारतीय टीमने मैदानावर जास्तीत जास्त वेळ घालवावा अशी आमची इच्छा होती. आम्हाला टीम इंडियाला त्यांच्या गुडघ्यावर आणायचं होतं. आम्हाला त्यांना मॅच बाहेर करायचं होतं” असं कॉनराड म्हणाले. प्रेस कॉन्फरन्समध्ये कॉनराड यांनी ग्रोवेल या इंग्रजी शब्दाचा वापर केला. याचा अर्थ होतो, ‘असहाय्य होऊन याचना करणं’

त्यावेळी विकेटवर सावली पडलेली असते

कॉनराड पुढे म्हणाले की, “आम्हाला संध्याकाळच्यावेळी नवीन चेंडू हवा होता. कारण त्यावेळी विकेटवर सावली पडलेली असते. वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळते. म्हणून आम्हाला लवकर डाव घोषित करायचा नव्हता. भारतीय फिल्डर्सनी जास्तीत जास्त वेळ मैदानावर घालवावा अशी आमची इच्छा होती. जेणेकरुन ते थकतील. त्यामुळे शेवटच्या दिवशी खेळणं त्यांच्याशी कठीण होईल”

टीम इंडियाला विजयासाठी किती धावांची गरज?

पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या टीमकडे 288 धावांची आघाडी असूनही त्यांनी दुसऱ्या डावात फलंदाजी केली. पाच विकेट गमावून त्यांनी 260 धावा केल्या. चौथ्या दिवशी शेवटच्या सत्रात दक्षिण आफ्रिकेने 2 विकेट काढून भारताला बॅकफूटवर ढकललं आहे. आज कसोटीच्या अखेरच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 522 धावांची गरज आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...