AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जाडेजा-हार्दिकमुळे माझी आणि कुलदीप यादवची जोडी फुटली : युजवेंद्र चहल

टीम इंडियाचे फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव दोघेही एकत्र टीम इंडियामध्ये पुन्हा दिसतील, याबाबतच्या शक्यता आता मावळल्या आहेत.

जाडेजा-हार्दिकमुळे माझी आणि कुलदीप यादवची जोडी फुटली : युजवेंद्र चहल
Yuzvendra Chahal - Kuldeep Yadav
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: May 21, 2021 | 6:12 PM
Share

मुंबई : टीम इंडियाचे फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yujvendra chahal) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) या दोघांना एकत्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहणं एक स्वप्न झालं आहे. कारण हे दोन्ही गोलंदाज एकाच सामन्यात पुन्हा दिसतील, यात आता शंका आहे. या दोन्ही गोलंदाजांनी मिळून अनेक सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. पण दोघेही सध्या खराब फॉर्ममधून जात आहेत. (We were in Indian team till Hardik Pandya was there : Yuzvendra Chahal explains why he and Kuldeep Yadav no longer play together)

कुलदीप यादवने टीम इंडियामध्ये आपले स्थान गमावले आहे, तर चहलला अंतिम अकरामध्ये स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्याच वेळी अनेक नवे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि चांगलं प्रदर्शन करत आहेत. त्यामुळे कुलदीप आणि युजवेंद्रला संघात स्थान मिळत नाहीये. वास्तविक, दोघांचा खराब फॉर्म तेव्हा सुरु झाला, जेव्हा ही जोडी फुटली. त्यामागे काय कारणं होती, याबाबत चहलने स्पोर्ट्स तकशी बोलताना अनेक खुलासे केले आहेत.

चहल म्हणाला की, ‘मी आणि कुलदीप यादव 2018 पर्यंत संघात एकत्र खेळलो. त्यामागे प्रमुख कारण होतं ते म्हणजे हार्दिक पंड्या. कारण हार्दिक एक वेगवान गोलंदाज आणि खालच्या क्रमांकावर फलंदाजी करणारा आक्रमक फलंदाज आहे. तो गोलंदाजी करत असताना दोन फिरकीपटू संघात खेळवले जात होते. परंतु त्याच्या दुखापतीनंतर रवींद्र जाडेजा संघात आला आणि त्यानंतर सगळं चित्र बदललं.

चहल पुढे म्हणाला की, जाडेजा हा फिरकी गोलंदाज आणि खालच्या क्रमांकावर फलंदाजी करणारा आक्रमक फलंदाज आहे. हार्दिक पंड्या जखमी झाल्यानंतर संघाला अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता होती, कारण परफेक्ट टीम कॉम्बिनेशनसाठी 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करू शकेल, अशा गोलंदाजाची आवश्यकता होती. त्यामुळे जाडेजाला संघात स्थान दिल्यानंतर कुलदीप किंवा मला दोघांपैकी एकालाच अंतिम 11 जणांच्या संघात स्थान मिळू लागलं. आमच्या कर्णधाराला मी आणि कुलदीप दोघांपैकी एकाचीच निवड करता येत होती.

…तर मला संघाबाहेर बसण्यास हरकत नाही : चहल

चहल म्हणाला की, संघ जिंकतोय तोवर मला संघाबाहेर बसण्यास काहीच हरकत नाही. जरी मी खेळत नसलो आणि संघ जिंकत असेल तर मी आनंदी आहे. चहलने पुढे सांगितलं की, मी गेल्या वर्षी 6 महिन्यांनंतर न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिका खेळली. मला खात्री होती की मी चांगली कामगिरी करेन, कारण मी नेटमध्ये चांगली गोलंदाजी करीत होतो. मी संघाचा भाग नाही असे मला कधीही वाटले नाही. या सर्व गोष्टी आपला आत्मविश्वास टिकवून ठेवण्यात मदत करतात.

चहल आऊट ऑफ फॉर्म?

युजवेंद्र चहल अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका इंग्लंड विरुद्ध खेळला होता. यावेळी तो तीन टी-20 सामने खेळला. यात त्याला केवळ तीन बळी मिळता आले. त्यानंत चहलची आयपीएल 2021 मधील कामगिरी विशेष नव्हती. आयपीएल स्थगित करण्यापूर्वी त्याने 7 सामन्यांमध्ये केवळ 4 बळी मिळवले होते.

इतर बातम्या

गोलंदाजांची धुलाई करण्यासाठी विराट-डिव्हिलियर्स जी बॅट वापरतात, ती कुठे आणि कोणत्या लाकडापासून बनते?

IPL च्या उरलेल्या 31 मॅचचं वेळापत्रक तयार, 29 तारखेला BCCI मोठी घोषणा करणार?

सौदी अरेबियाची मॉडेल ते इरफान पठाणची बायको, पहा किती झाला बदल?

(We were in Indian team till Hardik Pandya was there : Yuzvendra Chahal explains why he and Kuldeep Yadav no longer play together)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं