AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yuzvendra Chahal : भारताला फक्त एकच संघ हरवू शकतो… युजवेंद्र चहल ‘ते’ नाव सांगितलंच

भारताचा खेळाडू, लेग-स्पिनर युजवेंद्र चहल सध्या फक्त देशांतर्गत क्रिक्टे आणि इंडियन प्रीमिअर लीगपरताच दिसतोय. 2023 मध्ये त्याने भारतासाठी शेवटचा आंतराराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर तो बाहेर फार दिसला नाही. मध्यंतरीच्या काळात तर तो त्याच्या खेळामुळे नव्हे तर फक्त पर्सनल लाईफमुळेच चर्चेत होता.

Yuzvendra Chahal : भारताला फक्त एकच संघ हरवू शकतो... युजवेंद्र चहल 'ते' नाव सांगितलंच
युजवेंद्र चहलImage Credit source: social media
| Updated on: Feb 06, 2026 | 9:03 AM
Share

टीम इंडियाचा अनुभवा खेळाडू, स्पिनर युजवेंद्र चहल हा आंतराराष्ट्रीय क्रिकेटपासून बऱ्याच काळापासून दूर आहे. टी20 वर्ल्ड कप 2024 मधील संघात तर चहल होता, पण त्या स्पर्धेत त्याला एकाही सामन्यात खेलम्याची काही संधी मिळाली नाही. ऑगस्ट 2023 मध्ये तो वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मात्र त्यानंतर तो फक्त आयपीएल आणि देशांतर्गत सामन्यांतच दिसला. गेला काही काळ तर तो खेामुळे किवा परफॉर्मन्समुळे नव्हे तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमपुळेच प्रचंड चर्चेत होता.

युजवेंद्र चहल हा नुकताच एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात हजर होता. त्या वेळी त्याने त्याच्या करिअरशी संबंधित अनेक गुपितं सांगितलं. एवढंच नव्हे तर चहलने सोशल मीडिया ट्रोलिंग पासून ते रिटायरमेंट प्लान, टी20 वर्ल्ड कप मध्ये भारताची ताकद , टीम कॉम्बिनेशन आणि तरूण खेळाडूंची भूमिका या सर्वांवर त्याचं मत माडलं.

ट्रोलिंगमुळे फरक पडत नाही

35 वर्षांच्या युजवेंद्र चहलने त्याच्यावर होणारी टीका,ट्रोलिंग यावर प्रतिक्रिया दिली. मला ट्रोलिंगमुळे जास्त फरक पडत नाही असं तो स्पष्टच म्हणाला. पण लोकं जेव्हा दुसऱ्या कोणाचं नाव जोडून काही खासगी गोष्टी सांगतात, तर्क वितर्क करतात तेव्हा वाईट नक्कीच वाटतं असं चहलने सांगितल. पण या गोष्टींकडे जास्त लक्ष देण्यात, त्यांना महत्व देण्यात अर्थ नाही. क्रिकेटवरच फोकस केला पाहिजे, असंही त्याने सांगितलं.

रिटायर कधी होणार, काय म्हणाल चहल ?

चहलच्या निवृत्तीबद्दल, रिटायरमेंटबद्दलही अनेक अफवा उडत असतात. त्याबद्दलही त्याने सांगितलं. मी अजून 5-6 वर्ष तरी खेळू इच्छितो, असं चहलने स्पष्ट केलं. जोपर्यंत मला मैदानावर खेळण्यात आनंद मिळतोय, जोष आहेत, तोपर्यंत मी क्रिकेट खेळत राहीन, असं त्याने सांगितलं. याचदरम्यान चहलने आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 बाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले.

भारताला फक्त एकच संघ हरवू शकतो…

भारताला फक्त एकच संघ हरवू शकतो, तो म्हणजे स्वत: भारत, इतर कोणत्याही संघात भारतला हरवण्याची क्षमता नाही, असं चहलने सांगितलं. या संघात अनुभव आणि तरुणाईचा उत्साह यांचा उत्तम समतोल आहे. चहलने जसप्रीत बुमराहचे जगातील नंबर 1 गोलंदाज आणि हार्दिक पंड्याचे, संघाचा सर्वात महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून वर्णन केले. तर तिलक वर्मा आणइ अभिषेक श्रमा हे आक्रमक विचारसरणीते खेळाडू आहेत, जे संघाला नवी उर्जा देतात, असंही तो म्हणाला.

कोहली-रोहित बद्दल काय म्हणाला चहल ?

प्रत्येक खेळाडूचा वेळ येते आणि जाते, असा त्याचा विश्वास आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीतही, भारतीय टी-20 संघ उत्तम फॉर्ममध्ये दिसत आहे कारण हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादवसारखे अनुभवी खेळाडू संघाचे नेतृत्व करत आहेत असंही चहल म्हणाला.

मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.