AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सॅमसंगची टेक्नोलॉजी वापरुन शाओमी सर्व कंपन्यांना मागे टाकणार

भारतात 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच करण्याचे श्रेय पूर्णपणे MI कंपनीला दिले जाते. यानंतर आता सॅमसंगच्या टेक्नोलॉजीचा वापर करत  MI कंपनीद्वारे 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. 

सॅमसंगची टेक्नोलॉजी वापरुन शाओमी सर्व कंपन्यांना मागे टाकणार
| Updated on: Jun 20, 2019 | 8:22 PM
Share

नवी दिल्ली : Xiaomi या चीनी कंपनीने नुकतंच Redmi Note 7 Pro या स्मार्टफोनद्वारे भारतात प्रथमच 48 मेगापिक्सलाचा कॅमेरा लाँच केला आहे. त्यामुळे भारतात 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच करण्याचे श्रेय पूर्णपणे MI कंपनीला दिले जाते. यानंतर आता लवकरच  MI कंपनीद्वारे 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यात सॅमसंगच्या टेक्नोलॉजीचा वापर केला जाणार आहे.

XDA developer या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, Xiaomi ही कंपनी लवकरच भारतात 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. MI कंपनी Redmi K20 Pro या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचे दोन अल्ट्रा पिक्सल कॅमेरे लाँच करण्याची शक्यता आहे. याबाबतचे काही कोड्स काही डेव्हलपरला मिळाले आहेत.

दरम्यान Xiaomi या कंपनीने 64 मेगापिक्सल कॅमेऱ्याबाबत आतापर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली  नाही. मात्र Redmi K20 Pro या फोनच्या लीक झालेल्या माहितीनुसार या फोनद्वारे 64 मेगापिक्सलचे दोन अल्ट्रा पिक्सल कॅमेरे असणार आहेत.

विशेष म्हणजे Xiaomi कंपनी 64 मेगापिक्सल कॅमेरा स्मार्टफोनमध्ये सॅमसंग या कंपनीप्रमाणेच ब्राईट GW1 या कॅमेरा सेन्सर बसवण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ Xiaomi कंपनी समसंगच्या टेक्नॉलॉजीचा वापर करत 64 मेगापिक्सलचा कॅमेरा भारतात लाँच करु शकते.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आतापर्यंत फक्त समसंग या एकमेव कंपनीने 64 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर तयार केलं आहे. काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या समसंग Galaxy A70  स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र समसंगने या स्मार्टफोनमध्ये केवळ 32 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

संबंधित बातम्या : 

‘Redmi’ चे तीन स्मार्टफोन एकाचवेळी लाँच होणार!

Redmi चा पॉप अप सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन लवकरच बाजारात, किंमत तब्बल….

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली