AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Airtel, Jio, Vi युझर्ससाठी सरकारची आनंदवार्ता, टेलिकॉम कंपन्यांचा तो खेळ संपला, आता वर्षातून 13 वेळा रिचार्ज करण्याची झंझट नाहीच, अपडेट काय?

Telecom companies: 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीमुळे ग्राहकांना वर्षातून 13 वेळा रिचार्ज करावा लागतो. याबाबत ग्राहकांनी सरकारकडे वारंवार तक्रारी केल्या. अखेर त्याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. याविषयी सरकारने टेलिकॉम कंपन्यांचे कान टोचले आहेत. काय आहे अपडेट?

Airtel, Jio, Vi युझर्ससाठी सरकारची आनंदवार्ता, टेलिकॉम कंपन्यांचा तो खेळ संपला, आता वर्षातून 13 वेळा रिचार्ज करण्याची झंझट नाहीच, अपडेट काय?
Airtel, Jio, Vi users governmentImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 24, 2026 | 3:14 PM
Share

13 Recharge Plan: भारतातील टेलिकॉम कंपन्या 28 दिवस व्हॅलिडिटी प्लॅन देते. त्यांना मासिक प्लॅन म्हटले जाते. पण महिन्याचे 30 दिवस हे प्लॅन नसतात. तर केवळ 28 दिवसांचा हा प्लॅन असतो. याप्रकरणी आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी संसदेत आवाज उठवला. कंपन्यांच्या या खेळीमुळे युझर्सला वर्षभरात 12 ऐवजी 13 वेळा रिचार्ज करावे लागत आहेत. ग्राहकांच्या खिशावर नाहक एका रिचार्जचा बोजा पडल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी याप्रकरणी सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यानंतर सरकारने उत्तर देताना सरकारी कंपन्यांचे कान टोचले. काय म्हणाले मंत्री ज्योतिरादित्य (शिंदे)सिंदिया?

सरकारचा मोठा हस्तक्षेप

राघव चड्डा यांच्या प्रश्नाला मंत्री ज्योतिरादित्य शिंदे ( Jyotiraditya Scindia) यांनी उत्तर दिले. त्यांनी सरकारी टेलिकॉम कंपन्यांना 30 दिवसांचे प्लॅन बाजारात उतरवण्यास सांगितले आहे. त्यांनी Telecom Regulatory Authority of India (TRAI) ने अगोदरच टेलिकॉम कंपन्यांना निर्देश दिल्याचे सांगितले. त्यामुळे प्रत्येक टेलिकॉम कंपनी आता युझर्ससाठी कमीत कमी 30 दिवसांच्या प्लॅनचा पर्याय समोर आणण्याची शक्यता आहे.

TRAI चा नियम सांगतो काय?

TRAI ने 2022 मध्ये एक टॅरिफ नियम आणला. त्यानुसार, टेलिकॉम ऑपरेटर आपल्या प्रत्येक श्रेणीत प्रीपेड प्लॅनमध्ये कमीत एक 30 दिवसांचा प्लॅन देईल. याचा उद्देश युझर्सला 28 दिवसांच्या प्लॅनशिवाय एक मासिक चांगला पर्याय देण्याचा होता. त्यामुळे ग्राहकांना वारंवार रिचार्ज करण्याची गरज पडणार नाही यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

युझर्सला का करावे लागते 13 वेळा रिचार्ज

28 दिवसांचा प्लॅन प्रत्येक महिन्यातील 2-3 दिवस कमी सेवा देतो. त्यामुळे संपूर्ण वर्षभरात 365 दिवसांचे चक्र पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना 13 वेळा रिचार्ज करावे लागते. ही पद्धत कंपन्यांसाठी फायदेशीर असते. पण युझर्ससाठी ही पद्धत अत्यंत महाग ठरते.

डेटा संपल्यावर मात्र मोठे नुकसान

राघव चढ्ढा यांनी कंपनीच्या 28 दिवसांच्या खेळाची पोलखोल केली. या कंपन्या 28 दिवसांचा प्लॅन देतात. उदाहरणार्थ जर आपल्याला रोज 2GB डेटा मिळत असेल आणि त्यातील तुम्ही 1.5GB डेटाच वापरला असेल तर प्लॅन संपल्यावर उरलेला 0.5GB डेटा संपतो आणि ग्राहकांना मोठे नुकसान सहन करावे लागते.

Follow Us
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.