AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईल 100% चार्ज करताय… कधीच नका करु इतकी मोठी चूक, होईल नुकसान

कामात असताना मोबाईल बंद पडू नये म्हणून अनेक जण 100% मोबाईल चार्ज करतात... पण ही एक साधी वाटणारी चूक मोठी घातक ठरु शकते... त्यामुळे मोबाईल कधीच फूल चार्च करु नका... पण का? कारण घ्या जाणून...

मोबाईल 100% चार्ज करताय... कधीच नका करु इतकी मोठी चूक, होईल नुकसान
फाईल फोटो
| Updated on: Nov 15, 2025 | 11:33 AM
Share

आजकाल, स्मार्टफोन आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांकडे मोबाईल फोन आहेत. आज पूर्वीपेक्षा बाजार अनेक नवीन आणि महागडे फोन आहेत. मोबाईल कोणताही असो… प्रत्येक मोबाईलमधील महत्त्वाची गोष्ट म्हणचे चार्जिंग… मोबाईल चार्ज करताना काही महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. ज्यामुळे तुमचा मोबाईल देखील खराब होणार नाही आणि मोबाईलमध्ये असलेली बॅटरी देखील जास्त काळ टिकेल… तर जाणून घ्या अशा कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहे. ज्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे.

मोबाई चार्ज करताना कोणत्या गोष्टींची घ्याल काळजी?

अनेक लोकांची एक सामान्य सवय म्हणजे ते त्यांचे फोन नेहमीच फूल चार्ज म्हणजे 100 टक्के चार्ज करतात. पण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही सवय दीर्घकाळात तुमच्या बॅटरीला हानी पोहोचवू शकते. चला जाणून घेऊया का?

स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरीमध्ये मर्यादित चार्ज सायकल असतात. जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल 100 टक्के चार्ज करता आणि ही प्रक्रिया वारंवार पुनरावृत्ती करता तेव्हा बॅटरीची क्षमता लवकर कमी होते. त्यामुळे मोबाईल 100 टक्के चार्ज करणं टाळा. परिणामी, बॅटरी पूर्वीसारखी चार्ज ठेवू शकत नाही आणि लवकर संपू लागते.

मोबाईलची बॅटरी लवकर खराब होते: मोबाईल 100 टक्के चार्ज झाल्यावर बॅटरीवर उच्च व्होल्टेजचा ताण येतो, ज्यामुळे हळूहळू तिची रासायनिक रचना खराब होते. म्हणूनच, तज्ज्ञ चार्ज 80 – 90 टक्के ठेवण्याची शिफारस करतात, ज्यामुळे बॅटरीवर कमी ताण येतो.

बॅटरी जास्त गरम होण्याचा धोका: फोन पूर्णपणे चार्ज झाल्यावर, चार्जर आणि बॅटरीमधील संतुलन राखण्यासाठी अतिरिक्त उर्जेचे व्यवस्थापन करावे लागते. यामुळे फोन गरम होऊ शकतो आणि जलद गरम झाल्यामुळे बॅटरीचे आयुष्य कमी होते.

तुमचा फोन अशा प्रकारे चार्ज करा: फोन 20 ते 80 टक्क्यांच्या दरम्यान चार्ज ठेवा.  मोबाईल  रात्रभर चार्जिंग टाळा. जलद चार्जिंगचा वारंवार वापर टाळा, कारण त्यामुळे उष्णता वाढते. फक्त मूळ किंवा ब्रँडेड चार्जर वापरा.

Follow Us
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?.
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर.
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी.
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ.
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश.
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान.
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा.
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन.