AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईल वापरणे परवडणार नाही, या महिन्यापासून रिचार्ज महागणार, 3 मोठ्या कंपन्यांची तयारी पूर्ण

मोबाईलचा वापर करताना आता तुम्हाला विचार करावा लागणार आहे. कारण मोठी टेलिकॉम कंपन्यांनी आता स्वस्त प्लान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता याची थेट झळ दीर्घकाली प्लानचा वापर करणाऱ्यांना होणार आहे.

मोबाईल वापरणे परवडणार नाही, या महिन्यापासून रिचार्ज महागणार, 3 मोठ्या कंपन्यांची तयारी पूर्ण
mobile plane hike
| Updated on: Nov 08, 2025 | 5:00 PM
Share

मोबाईल वापरणे महाग होणार आहे. कारण आता एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडिया सारख्या मोठ्या कंपन्या ग्राहकांना महागाईत झटका देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या रिचार्ज आणि डेटा प्लान्सच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे मोबाईल युजर्सच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे.

तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या त्यांच्या रिचार्ज प्लानची किंमत वाढवण्याची तयारी करत आहेत. असा अंदाज लावला जात आहे की हा बदल डिसेंबर २०२५ पासून लागू होऊ शकतो. ज्याचा परिणाम प्रीपेड आणि डेटा वाल्या प्लान्सवर सर्वाधिक होऊ शकतो. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार टेलिकॉम कंपन्यांसाठी हे आवश्यक आहे की मोठे कर्ज फेडण्यासाठी प्रति युजर २०० रुपयांहून अधिक कमाई केली जावी, जी सध्या सरासरी १८० ते १९५ रुपयांच्या दरम्यान आहे.

असा अंदाज लावला जात आहे की १९९ रुपयांचा प्लान २२२ रुपये, तसेच २९९ रुपयांचा २८ दिवस (2GB/दिवस ) वाला प्लान, ३३०-३४५ रुपयांचा ८४ दिवसांचा 2GB/दिवसाचा प्लान ९४९ रुपये ते ९९९ रुपयांपर्यंत महाग होऊ शकतो. या दरवाढीमुळे ग्राहकांना दीर्घकाळाचा प्लान्स वापरताना अधिक पैसा खर्च करावा लागणार आहे.

स्वस्तातील प्लान बंद करणार

एअरटेल आणि वोडाफोन आयडिया कंपन्यांनी सांगितले की टेलिकॉम कंपन्यांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्याची तयारी सुरु केली आहे. 5G नेटवर्कच्या विस्तारासाठी मोठी गुंतवणूक या कंपन्यांकडून सुरु आहे. त्यामुळे या कंपन्यांनी थेट दरवाढ न करता स्वस्तातील प्लानना हळहळू सेवेतून बंद करण्यास सुरु केले आहे.

रिचार्ज प्लान वाढण्याची शक्यता

डिसेंबर २०२५ ते जून २०२६ दरम्यान मोबाईल रिचार्जचे प्लान वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जिओ कंपनी त्यांचा आयपीओ येण्यापूर्वीच १५ टक्के दरवाढ लागू करु शकते. तर इतर कंपन्या १० टक्के दरवाढ लागू करु शकतात.

यूजर्सना एकमेव संधी ?

जर तुम्हाला महागाईपासून वाचायचे असेल तर तज्ज्ञांचा सल्ला आहे की नोव्हेंबर २०२५ मध्ये दीर्घकालीन व्हॅलिटीडीचा प्लान रिचार्ज करावा, यामुळे तुम्हाला सध्याच्या दरात पुढील अनेक महिन्यांची सेवा मिळू शकते. जर तुम्ही दीर्घकालिन डेटाचा वापर करत असाल तर वार्षिक, वा त्याहून दीर्घ वैधतेचा प्लान रिचार्ज करणे फायद्याचे होऊ शकते. BSNL सध्या या दरवाढी पासून लांब आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक