AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा धातू सोन्याचा कर्दनकाळ, दागिन्यांसोबत चुकूनही एकत्र ठेवू नका, पाहा हा Viral Video

सोन्याची चमक सहसा जात नाही असे म्हटले जाते. अनेक एसिडचा सोन्यावर विशेष परिणाम होत नाही असे म्हटले जाते. मात्र, एक धातू आहे सोन्याचा कर्दनकाळ, पाहा कोणता धातू सोन्याला गिळंकृत करतो ?

हा धातू सोन्याचा कर्दनकाळ, दागिन्यांसोबत चुकूनही एकत्र ठेवू नका, पाहा हा Viral Video
gold
| Updated on: Apr 14, 2026 | 12:53 PM
Share

सोन्याला पुरातनकाळापासून सर्वात मौल्यवान धातू म्हटले जाते. याची पिवळी सोनेरी चमक, शुद्धता आणि दीर्घकाळ खराब न होता टिकण्याच्या क्षमता यास खास बनवते. सर्वसाधारणपणे सोने कधीच खराब होत नाही असे म्हटले जाते. परंतू एक धातू असा आहे जो सोन्याचे गुणधर्म बदलून टाकू शकतो. हा धातू आहे पारा. ज्यास इंग्रजी मर्क्युरी म्हणतात.

पारा जेव्हा सोन्याच्या संपर्कात येतो, तेव्हा एक विशेष प्रक्रिया सुरु होते ज्यास Chemistry मध्ये अमलगमेशन म्हटले जाते. या प्रक्रियेत पारा सोन्याच्या सुक्ष्म कणांना आपल्या आत शोषून घेतो. याचा परिणाम हा होतो की सोने त्याची नैसर्गिक चमक हरवून बसते आणि त्यांचे स्वरुप बदलते. ते नरम, चिपचिपे आणि कधी-कधी धूसर किंवा चांदी सारखे दिसू लागते.

अखेर या व्हिडीओत काय झाले ?

हा कोणता नवा शोध नाही. जुन्या काळापासून सोन्याच्या खाणीत पाऱ्याचा उपयोग केला जात आहे.उत्खणन करताना जेव्हा सोने जेव्हा कच्चा स्वरुपात माती आणि दगडात मिक्स असते. तेव्हा त्याला वेगळे करण्यासाठी पारा उपयोगाला येतो. पारा सोन्याच्या कणांना आकर्षित करुन एक मिश्रण बनवतो. नंतर या मिश्रणाला गरम केले जाते. ज्यामुळे पारा बाष्प बनून उडून जातो आणि शुद्ध सोने खाली जाते. मात्र, ही प्रक्रिया औद्योगित स्तरावर नियंत्रित परिस्थितीत सुरक्षित असते.

घरगुती पातळीवर पाऱ्याचा संपर्क शरीरासाठी अत्यंत नुकसान दायक असतो. समजा घरातील एखादा जुना थर्मामीटर तुटला तर त्यातून निघालेल्या पाऱ्याचा चकूनही सोन्याच्या दागिन्यांना स्पर्श झाला तर याचे परिणाम धोकादायक होऊ शकतात. त्या दागिन्यांची चमक फिकी पडू शकते. त्यांचा रंग बदलू शकतो. आणि ते कमजोर होऊ शकतात. काही प्रकरणात दागिने इतके नरम होतात की ते तुटतात. अनेक लोकांना हा अनुभव सांगितला आहे.पाऱ्याच्या संपर्कात आल्यानंतर सोन्याचे दागिने चांदी सारखे दिसू लागले आणि हळूहळू त्यांची गुणवत्ता घसरत गेली.

Scientific Temper दुष्टीने पाहिले तर सोने हा स्थिर धातू आहे.तो सहजपणे कोणत्याही रासायनिक प्रक्रीयेत सामील होत नाही. अधिकांश एसिड देखील यास नुकसान पोहचवू शकत नाही. परंतू पाऱ्यासोबत याचा व्यवहार वेगळा होता. येथे कोणतीही सामान्य रासायनिक प्रतिक्रीया होत नाही. एक Alloy बनते. पारा सोन्याच्या अणूच्या दरम्यान जागा बनवतो आणि त्याच्या अंतर्गत संरचनेला बदलतो. याच कारणाने सोन्याचे गुण प्रभावित होतात.

येथे पाहा व्हिडीओ –

View this post on Instagram

A post shared by NEWS 365 DAYS (@news360days)

केवळ सोनेच नाही तर पारा अन्य धातूंसोबत उदा. चांदी, जस्त आणि एल्युमिनियम सोबत देखील पाऱ्याची हीच प्रक्रिया होते. लोखंडासोबत मात्र पारा असे वागत नाही. त्यामुळे जुन्या काळात पाऱ्याला सुरक्षित ठेवण्यासाठी लोखंडाची भांडी वापरायचे. पाऱ्याची आणखी एक धोका म्हणजे त्याचा विषारीपणा. हा धातु अत्यंत विषारी आहे. याची वाफ जर श्वासासोबत शरीरात गेली तर नर्व्हस सिस्टीम, किडनी आणि मेंदूला गंभीर नुकसान होऊ शकते. दीर्घकाळ याच्या संपर्कात आल्यानंतर स्मृती कमजोर होते. हातपाय थरथरणे आणि मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. खास करुन लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी हा जास्त धोकादायक असतो. त्यामुळे पाऱ्याशी संबंधित गोष्टींना काळजीपूर्वक हाताळावे.

Follow Us
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक.
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख...
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख....