AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवासी वाहतूकीद्वारे रेल्वेला केवळ 20 टक्केच होते कमाई, मग उर्वरित उत्पन्न येते कुठून ?

रेल्वेला प्रवासी भाड्यातून कोणताही फायदा होत नाही. उलट झाला तर तोटाच होत असतो, मग रेल्वेचा गाडा चालतो कसा ? पाहूया...

प्रवासी वाहतूकीद्वारे रेल्वेला केवळ 20 टक्केच होते कमाई, मग उर्वरित उत्पन्न येते कुठून ?
indian-railwayImage Credit source: socialmedia
| Updated on: Apr 01, 2023 | 7:19 PM
Share

नवी दिल्ली : रेल्वेने दररोज दोन कोटीहून अधिक प्रवासी प्रवास करीत असतात. परंतू या प्रवासी तिकीटाच्या उत्पन्नातून रेल्वेला केवळ वीस टक्केच उत्पन्न मिळत असते. रेल्वेचे प्रवासी भाडे खूपच कमी असते. कारण या रेल्वे भाड्याला सबसिडी दिलेली आहे. रेल्वेचा प्रवास सर्वात स्वस्त आणि खात्रीलायक असतो. लोक रस्ते मार्गाने प्रवास करण्यापेक्षा आरामदायीपणा तसेच स्वस्त तिकीट असल्याने रेल्वेने लांबचा प्रवास करण्याला प्राधान्य देत असतात. मात्र रेल्वेला यातून जास्त कमाई होत नसते, मग रेल्वेचे भागते कसे हे पाहूया…

रेल्वेच्या प्रवासी तिकीटाद्वारे रेल्वेला केवळ वीस टक्केच उत्पन्न मिळत असते. त्यामुळे रेल्वेला उत्पन्न कुठून मिळते हे पहायला हवे, जर प्रवासी तिकीटांमधून रेल्वेला काहीच फायदा होत नसेल तर रेल्वे आपला खर्च कसा भागवते हे पहाणे महत्वाचे आहे.

मालभाड्यातून होते कमाई

रेल्वे प्रवाशांच्या वाहतूकी सोबत रेल्वेचे खूप मोठे जाळे मालवाहतूकीसाठी वापरले जाते. एका आकडेवारीनूसार रेल्वेने दररोज दोन कोटींहून अधिक प्रवासी रोजचा प्रवास करीत असतात. तर दररोज नऊ हजाराहून अधिक मालगाड्या चालविल्या जात असतात. त्यामुळे रेल्वेला इतर मार्गाने होणारी कमाई रेल्वे प्रवासी वाहतूकीला सबसिडी देण्यासाठी वापरत असते. त्यामुळे रेल्वेचा प्रवास इतर प्रवासी साधनांपेक्षा स्वस्त असतो.

येथून होत असते कमाई

भारतीय रेल्वेचे नेटवर्क जगातील सर्वात मोठ्या नेटवर्क पैकी मानले जाते. रेल्वेला मेन्टेनन्ससाठी खूप जास्त खर्च येतो. या खर्चाला पूर्ण करण्यासाठी रेल्वेला खूपच पैशाची गरज असते. वाणिज्य मंत्रालयाच्या सरकारी ट्रस्ट इंडीया ब्रांड इक्वीटी फाऊंडेशनच्या रिपोर्टनूसार आर्थिक वर्षे 2021-22 मध्ये रेल्वेच्या प्रवासी भाड्यातून कमाईचा वाटा 20.2 टक्के राहीला आहे. मालभाड्यातून कमाईचा वाटा 75.2 टक्के होता. तर अन्य 4.6 टक्के कमाई इतर स्रोतामधून झाली आहे. ज्यात रेल्वेचे भंगार विक्री आणि इतर योजनांचा समावेश आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.