AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhiwandi Video: मुंबईजवळ असेलल्या भिवंडीतील भयान वास्तव! मुलांच्या शिक्षणासाठी स्वत: होडी चालवणाऱ्या कांताला सलाम

भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी ग्रामपंचायत हद्दीतील पलाट पाडा या गावात अत्यंत दुरवस्था आहे. या गावात शासनाची कोणतीही व्यवस्था नाही. उसगांव तलावाच्या किनाऱ्यावर असलेला हा पाडा अनेक समस्यांनी ग्रासला आहे .परंतु याच डॅम मधून दररोज वसई विरार महानगरपालिकेला 20 एम एल टी पाणी पुरवठा करून तहान भागवत असताना या पाड्यावर नळ पाणी पुरवठा योजना नाही .ना वीज आहे ना रस्ता ,त्यामुळे येथील जंगलातील कच्ची पायवाट पावसाळ्यात बंद होते ,तेथील ओढ्याला सुध्दा पाणी वाढत असल्याने नावेतून प्रवास करून उसगाव या पलीकडे अर्धा तसाच नावेतून प्रवास करून यावे लागते.त्यामुळे या पाड्यावर असणाऱ्या 30 घरातील सुमारे 35 ते 40 विद्यार्थी यांचे शिक्षणासाठी उसगाव अथवा वज्रेश्वरी येथे जाण्यासाठी नावेचा वापर करावा लागतो .

Bhiwandi Video: मुंबईजवळ असेलल्या भिवंडीतील भयान वास्तव! मुलांच्या शिक्षणासाठी स्वत: होडी चालवणाऱ्या कांताला सलाम
| Edited By: vanita kamble | Updated on: Jul 29, 2022 | 12:22 AM
Share

मुंबई : मंत्रालया पासून 79 किमी अंतरावर तर ठाणे जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 49 किमी अंतरावर भिवंडी(Bhiwandi) वसई तालुक्याच्या सीमेवरील गणेशपुरी ग्रामपंचायती मध्ये समाविष्ट असलेला ऊसगाव डॅम नजीकचा पलाट पाडा आज ही वीज रास्ता पाणी या मूलभूत सोयीं पासून कोसो दूर आहे. या आदिवासी पाड्यातील मुलांचे शिक्षण अडचणीत येऊ नये यासाठी याच पाण्यामुळे शिक्षण अर्धवट राहिलेल्या कांता चिंतामण बरफ ही मुलगी मागील दोन वर्षां पासून शालेय मुलांना सकाळ संध्याकाळ शाळेत घेवुन जाण्या साठी नावेचे सारथ्य करीत आहे .

भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी ग्रामपंचायत हद्दीतील पलाट पाडा या गावात अत्यंत दुरवस्था आहे. या गावात शासनाची कोणतीही व्यवस्था नाही. उसगांव तलावाच्या किनाऱ्यावर असलेला हा पाडा अनेक समस्यांनी ग्रासला आहे .परंतु याच डॅम मधून दररोज वसई विरार महानगरपालिकेला 20 एम एल टी पाणी पुरवठा करून तहान भागवत असताना या पाड्यावर नळ पाणी पुरवठा योजना नाही .ना वीज आहे ना रस्ता ,त्यामुळे येथील जंगलातील कच्ची पायवाट पावसाळ्यात बंद होते ,तेथील ओढ्याला सुध्दा पाणी वाढत असल्याने नावेतून प्रवास करून उसगाव या पलीकडे अर्धा तसाच नावेतून प्रवास करून यावे लागते.त्यामुळे या पाड्यावर असणाऱ्या 30 घरातील सुमारे 35 ते 40 विद्यार्थी यांचे शिक्षणासाठी उसगाव अथवा वज्रेश्वरी येथे जाण्यासाठी नावेचा वापर करावा लागतो .

परंतु घरातील व्यक्ती शेतावर कामावर गेल्याने नाव चालवायला कोणी नसल्याने बऱ्याच वेळा शाळा विद्यार्थ्यांची बुडत असे. अशीच कथा कांता हिच्या वाट्याला आली व त्यातच तिने या अडथळ्यांना कंटाळून शाळा नववी मध्ये सोडली. परंतु यामधून आलेले नैराश्य कांताला शांत बसू देत नव्हते त्यामुळे तिने मागील दोन वर्षां पासून आपल्या पाड्यातील लहानग्या मुलांची शाळा नाव चालवायला कोणी नाही म्हणून बुडू नये या साठी कांता ने पुढाकार घेत या मुलांना दररोज शाळेत जाण्यासाठी व सायंकाळी घरी येताना नावेचे सारथ्य करण्याचा निर्णय घेतला .त्यातून या मुलांचे शिक्षण अर्धवट राहणार नाही हा विश्वास कांताने व्यक्त केला आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर उत्साहात साजरा केला जात असताना मुंबई या राजधानी च्या शहरापासून 79 किमी तर ठाणे जिल्ह्या कार्यालयापासून 49 किमी अंतरावर असलेल्या पलाट पाडा नागरी सुविधां पासून वंचित असल्याची चिंता श्रमजीवी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पवार यांनी केली आहे .या गावातील नागरिक मतदान करतात ,पण मग त्यांना नागरी आरोग्य सुविधां पासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना वंचित ठेवले जात असल्याचे वास्तव मांडले .तर हार घर झेंडा ही संकल्पना राबविली जात असताना ज्या घरात वीज नाही नळाचे पाणी नाही ,रस्ता नाही त्या घरांवर झेंडा फडकणारच कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे .

Follow Us
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती