AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साप चावल्यावर जीवही जाणार नाही, फक्त पाळा नागलोकवाला गोल्डन रूल आणि टाइम ट्रिक

सापाला पाहून सर्वांनाचा थरकाप उडतो. तसेच जर साप चावला तर लोक चांगलेच घाबरतात. कधीकधी हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत देखील पिडीताचा मृत्यू होतो. त्यामुळे नागलोकवाला गोल्डन रूल आणि टाइम ट्रिक पाळलीत तर तुमचा जीव वाचेल यात शंकाच नाही. आता ही ट्रीक काय आहे जाणून घ्या..

साप चावल्यावर जीवही जाणार नाही, फक्त पाळा नागलोकवाला गोल्डन रूल आणि टाइम ट्रिक
Snake byteImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 07, 2025 | 1:13 PM
Share

पाऊस पडल्यामुळे सतत साप चावण्याच्या घटना सतत समोर येत आहेत. साप चावल्यानंतर लोक घाबरुन अनेकदा असे चुकीचे पाऊल उचलतात, जे जीवघेणे ठरताते. काही वेळा हा निष्काळजीपणा आजूबाजूच्या लोकांनाही महागात पडते. साप चावल्यानंतर अनेकलोक घाबरतात, त्यामुळे त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे सापाचे विष शरीरात झपाट्याने पसरते. अशा परिस्थितीमध्ये साप चावलेल्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे साप चावल्यावर कोणत्या गोष्टी करायला हव्यात एका जाणून घ्या…

घाबरल्यामुळे चुकीचे पाऊल

एका सर्पमित्राने सांगितले की, साप चावल्यानंतर अनेकदा लोक अज्ञानामु ळे किंवा घाबरल्यामुळे अशा चुका करतात. त्यामुळे पीडिताचा जीव धोक्यात येतो. त्यांचा अनुभव सांगतो की योग्य माहिती आणि त्वरित उपचार हाच हा उपाय जीव वाचवू शकतो.

वाचा: लघवीला वास येतोय? फक्त आहार नाही, तर गंभीर आजारांचा संकेत; जाणून घ्या 5 कारणे

साप चावताच सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे पीडिताला एक क्षणही न दवडता जवळच्या रुग्णालयात पोहोचवणे. ‘गोल्डन पीरियड’ म्हणजे साप चावल्यानंतरच्या सुरुवातीच्या काही तासांत जर रुग्णाला अँटी-व्हेनमचा डोस मिळाला, तर त्याचा जीव वाचू शकतो. त्यामुळे वेळेत रुग्णालयात पोहोचणे हीच पहिली प्राथमिकता असावी. साप चावल्यानंतर त्या सापाला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न अजिबात करू नये. त्या वेळी साप अत्यंत आक्रमक आणि संतापलेला असू शकतो, ज्यामुळे तो दुसऱ्या कोणाला चावू शकतो आणि परिस्थिती आणखी गंभीर बनू शकते.

सापाचे स्पष्ट छायाचित्र घ्या

शक्य असल्यास, सापाचे स्पष्ट छायाचित्र घ्या, पण असे करताना पूर्ण खबरदारी घ्या. छायाचित्र पाहून डॉक्टरांना साप हिमोटॉक्सिन (रक्तावर परिणाम करणारा) आहे की न्यूरोटॉक्सिन (मज्जासंस्थेवर परिणाम करणारा) याचा प्रकार ओळखता येईल, ज्यामुळे योग्य अँटी-व्हेनम निवडणे सोपे होईल आणि उपचार प्रभावी ठरतील.

चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे सापाचे विष शोषून घेणे किंवा जखमेला घट्ट बँडेज बांधणे यासारख्या पद्धतींपासून पूर्णपणे टाळावे. विष शोषल्याने शोषणाऱ्या व्यक्तीचा जीवही धोक्यात येऊ शकतो आणि जखमेला घट्ट बांधल्याने रक्ताभिसरण थांबू शकते, ज्यामुळे प्रभावित अवयवाला मोठे नुकसान होऊ शकते.

तांत्रिक क्रिया किंवा औषधी वनस्पतींच्या वापर पूर्णपणे टाळावा. अशा अवैज्ञानिक पद्धती केवळ वेळेची नासाडी करतात आणि पीडिताला रुग्णालयात पोहोचण्यास अनावश्यक विलंब होतो. साप चावण्याचा एकमेव प्रमाणित उपचार म्हणजे अँटी-व्हेनम, जो फक्त सरकारी आणि काही खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे अंधश्रद्धेत न पडता तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)

Follow Us
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी.....
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.