AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजपासून पुढचे 63 दिवस अंधार, थेट पुढच्या वर्षी उगवणार सूर्य… का आणि कुठे होणार असे? जाणून घ्या

पृथ्वीवरील एका शहरातील सूर्य मावळला आहे. आता तो 22 जानेवारी 2026 पर्यंत उगवणार नाही. त्यापूर्वी हा संपूर्ण भाग अंधारात राहणार आहे. या काळात येथील तापमान वारंवार शून्य डिग्री सेल्सियसपेक्षाही खाली जाते आणि सूर्य न उगवल्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. आता हे शहर कोणते जाणून घ्या...

आजपासून पुढचे 63 दिवस अंधार, थेट पुढच्या वर्षी उगवणार सूर्य... का आणि कुठे होणार असे? जाणून घ्या
CityImage Credit source: X/@Rainmaker1973
| Updated on: Nov 21, 2025 | 2:54 PM
Share

थंडीच्या दिवसांत अनेकदा असं घडतं की सूर्य फारच कमी दिसतो. वातावरणात गारवा असतो. कारण सर्वत्र धुके पसरलेलं असतं. तरीही सामान्यतः 1-2 किंवा फारफार तर 3 दिवसांत सूर्य एकदा तरी दिसतोच, पण तुम्हाला माहिती आहे का की पृथ्वीवर एक असे शहर आहे जिथे सूर्य 2-2 महिने उगवतच नाही? होय, हे शहर पृथ्वीरच आहे. सुमारे 4600 लोकसंख्या असलेल्या या शहरात 18 नोव्हेंबर रोजी यंदाचा शेवटचा सूर्यास्त झाला आहे. म्हणजे येथे सूर्य अधिकृतपणे मावळला आहे. आता सूर्य थेट 22 जानेवारी 2026 पर्यंत पुन्हा उगवणार नाही. तुम्हीही चकीत झाला असाल ना? आता पृथ्वीर हे शहर कुठे आहे चला जाणून घेऊया…

कोणते आहे ते शहर?

आम्ही ज्या शहराविषयी बोलत आहोत ते शहर आहे अलास्का. ज्याचं नाव उत्कियाग्विक शहर आहे. हे शहर यापूर्वी बैरो म्हणून ओळखलं जायचं. आर्क्टिक वर्तुळाच्या उत्तरेकडे सुमारे 483 किलोमीटर अंतरावर वसलेले हे शहर बराच काळ अंधारात राहणार आहे. कारण उत्तर गोलार्ध सप्टेंबर आणि मार्च दरम्यान सूर्यापासून दूर होणार आहे. ज्यामुळे अत्यंत उत्तरेकडील अक्षांशांवर दिवसाचा प्रकाश हळूहळू कमी होत जातो आणि डिसेंबर किंवा संक्रांतीच्या सुमारास तो आपल्या शिखरावर पोहोचतो. या कालावधीत येथे प्रकाश कधीकधी ऑरोरा बोरियालिसच्या चमकने होतो. शास्त्रज्ञांच्या मते, उत्कियाग्विकमध्ये पुढचा सूर्योदय 22 जानेवारी 2026 पूर्वी होण्याची अपेक्षा नाही.

मीडिया अहवालांनुसार, ध्रुवीय रात्रीदरम्यान येथील परिस्थिती अत्यंत कठोर असते. तापमान वारंवार शून्य डिग्री फॅरनहाइटपेक्षाही खाली जाते आणि सूर्य न उगवल्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. नंतर हळूहळू वसंत ऋतू येतो तसे दिवसाचा उजेड परत येऊ लागतो. तसेच मे महिन्याच्या मध्यापर्यंत परिस्थिती पूर्णपणे उलट होते. त्या वेळेपासून ते ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत सूर्य मावळत नाही. म्हणजे या कालावधीत येथे 24 तास दिवसाचा उजेड राहतो.

दक्षिण ध्रुवावर 6 महिने सतत चमकतो सूर्य

दक्षिण ध्रुवावर ही घटना आणखीच नाट्यमय असते. जिथे आर्क्टिकमधील शहरे आठवडोंआठवडे अंधारात राहतात, तिथे दक्षिण ध्रुवावर सुमारे सहा महिने सतत सूर्य चमकत राहतो, कारण तो नेमका त्या बिंदूवर आहे जिथे पृथ्वीच्या झुकावाचा सर्वाधिक परिणाम होतो. जेव्हा आर्क्टिकमध्ये अंधार असतो तेव्हा दक्षिण ध्रुवावर सूर्यप्रकाश असतो आणि जेव्हा आर्क्टिकमध्ये मध्यरात्री सूर्य चमकतो, तेव्हा दक्षिण ध्रुव आपल्या अर्धवार्षिक रात्रीच्या आघोषात बुडालेला असतो.

Follow Us
लिंगपिसाट खरातची तब्येत अचानक बिघडली, ऑक्सिजनवर ठेवलं...
लिंगपिसाट खरातची तब्येत अचानक बिघडली, ऑक्सिजनवर ठेवलं....
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.