AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Interesting Facts: शहरांच्या नावासमोर ‘पूर’ आणि ‘बाद’ असं का लिहिले जाते? हे आहे कारण

एखाद्या शहराच्या नावाच्या शेवटी 'पूर' किंवा 'बाद' असं का लिहितात? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आज आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Interesting Facts: शहरांच्या नावासमोर 'पूर' आणि 'बाद' असं का लिहिले जाते? हे आहे कारण
Pur and bad Name History
| Updated on: Sep 21, 2025 | 3:31 PM
Share

तुमच्यापैकी अनेकांनी शहरांच्या नावांच्या शेवटी ‘पूर’ किंवा ‘बाद’ असं लिहिलेलं नक्कीच पाहिलं असेल. नागपूर, सोलापूर, कानपूर, बदलापूर या भारतातील प्रमुख शहरांच्या नावातही ‘पूर’ या शब्दाचा उल्लेख आढळतो. हैदराबाद, गाझियाबाद, अहमदाबाद ही काही भारतातील प्रमुख शहरे आहेत, ज्यांच्या नावाच्या शेवटी ‘बाद’ असलेलं आढळतं. मात्र एखाद्या शहराच्या नावाच्या शेवटी ‘पूर’ किंवा ‘बाद’ असं का लिहितात? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आज आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शहराच्या नावाच्या शेवटी ‘पूर’ का लिहिले जाते?

भारतात अशी अनेक शहरे आणि गावे आहेत त्यांच्या नावाच्या शेवटी पूर असे लिहिलेले असते. पूर हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे. या शब्दाचा अर्थ म्हणजे शहर किंवा किल्ला. हा शब्द प्राचीन काळापासून वापरला जात आहे. ऋग्वेदातही हस्तिनापूरसारख्या प्राचीन शहरांच्या नावाचा समावेश आहे. जुन्या काळातील अनेक राजे त्यांच्या शहरांची नावे देताना त्यांच्या नावांमध्ये पूर हा शब्द जोडत असत. भावी पिढ्यांना त्यांच्या राजांची नावे लक्षात राहावीत यासाठी राजाच्या नावासमोर पूर असे जोडले जात असे. याच कारणामुळे राजा जयसिंग यांनी आपल्या शहराचे नाव जयपूर असे ठेवले असल्याचे बोलले जाते.

शहराच्या नावाच्या शेवटी ‘बाद’ का लिहिले जाते?

भारतात गाझियाबाद, अहमदाबाद, फिरोजाबाद, पाकिस्तानात इस्लामाबाद अशा नावांची शहरे आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे बाद हा शब्द ‘आबाद’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. ‘आबाद’ हा पर्शियन एक शब्द आहे ज्यामध्ये ‘आब’ म्हणजे पाणी. हा शब्द जमीन किंवा ठिकाण दर्शवते जिथे पिके घेता येतात. तसेच ही जागा अशी असावी जी राहण्यायोग्य असेल आणि पुरेसा पाणीपुरवठा असेल. याच कारणामुळे अनेक शहरांच्या नावाच्या शेवटी बाद असे लिहिलेले आहे.

बऱ्याच वेळा अनेक राजे आपल्या नावाच्या शेवटी बाद असे जोडून ते नाव शहराला द्यायचे. फिरोजाबादचे नाव फिरोजशाहच्या नावावरून ठेवण्यात आले. 1411 मध्ये सुलतान अहमद शाहने आपल्या नावावरून शहराचे नाव ‘अहमदाबाद’ असे ठेवले होते. याच कारणांमुळे बऱ्याच शहरांच्या आणि गावांच्या नावाच्या शेवटी पूर आणि बाद असे लिहिलेले आढळते.

Follow Us
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला.

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?.

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?