AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाहनचालकांनो, चुका कराल तर insuranceचा छदामही मिळणार नाही, वाचा काय करावं आणि काय करू नये

वाहनासाठी मोटार अपघात विमा घेणे पुरेसे नाही. अनेक वेळा पॉलिसीसाठी पूर्ण पैसे भरूनही एखादी छोटी चूक तुमचा दावा फेटाळायला पुरेशी ठरते.

वाहनचालकांनो, चुका कराल तर insuranceचा छदामही मिळणार नाही, वाचा काय करावं आणि काय करू नये
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 26, 2022 | 10:47 AM
Share

मुंबई: औरंगाबाद येथील देवदत्त यांच्या गाडीचे एका अपघातात प्रचंड नुकसान झाले, सुदैवाने कार चालवणाऱ्या देवदत्तला फारशी इजा झाली नाही, गाडीचे तीन तेरा वाजले. पण त्याचा जीव वाचला. मोटार विम्याचे वेळेत नूतनीकरण (Vehicle Insurance) केल्यामुळे देवदत्तला गाडीची चिंता नव्हती. मात्र विमा कंपनीने देवदत्तचा दावा फेटाळून (Claim Rejected) लावला. याचे कारण म्हणजे देवदत्तने विम्याचे नूतनीकरण (Insurance Renewal) केले होते, पण अपघाताच्या काही दिवस आधी मुदत संपलेल्या ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करण्यास तो विसरला होता. देवदत्तप्रमाणेच अनेकदा वाहनचालकांना निष्काळजीपणा आणि इतर चुका भोंवतात. त्यांचा दावा फेटाळण्यात येतो. त्यामुळे दावा फेटाळण्यात येऊ नये यासाठी या गोष्टींची वेळीच पुर्तता करणे आवश्यक आहे. इथे आळस झटकला तर दावा मंजूर व्हायला कुठलाही अडथळा येणार नाही.

पॉलिसीचे वेळेत नूतनीकरण नका

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉलिसीचे वेळेत नुतनीकरण करा. दरवर्षी वेळेच्या आधीच विमा संरक्षण घ्या. ॲड ऑन सेवेद्वारे तुमच्या विम्याची व्याप्ती वाढवा. पॉलिसी कायम ठेवण्यासाठी मोटार वाहन अपघात विमा पॉलिसीचे नूतनीकरण वेळेत करा. एकदा प्रीमियम चुकल्यानंतर आपल्या संपूर्ण दावा प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. कारण त्या काळात काही नुकसान झाले तर ते पॉलिसीत समाविष्ट होत नाही.

दारू पिऊन गाडी चालवला तर विम्याला मुकाल

वैध वाहन परवान्याशिवाय वाहन चालविणे किंवा मद्यपान करून वाहन चालविणे हे मोटार वाहन अपघात विम्यातील दावा नाकारण्याचे सर्वात महत्त्वाचे आणि सर्वसामान्यपणे कारण आहे. जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असाल आणि अपघात झाला, त्यात गाडीचे नुकसान झाले असेल तर विमा कंपनी कायदेशीररित्या तुमच्या नुकसानीचा दावा पूर्ण करण्यास बांधील नाही.

अनुषांगिक खर्चासाठी तयार रहा

वाहनाचे कालांतराने होणारे बिघाड, रंग उखडणे व टायरमधील दोष हे वाहनातील सामान्य नुकसान मानले जाते. त्यामुळे वाहनाचा विमा दावा दाखल करताना या गोष्टींसाठी दावा केल्यास तो फेटाळला जाईल.

चुकीची माहिती देणे टाळा

पॉलिसीधारकाने पॉलिसी खरेदी करताना वाहनाशी संबंधित सर्व माहिती अचूकपणे द्यावी. तसेच वाहनाच्या वापराशी संबंधित योग्य माहिती द्यावी. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या व्यवसायासाठी वाहनाचा वापर करत असाल आणि तुम्ही ही माहिती लपवून ठेवली असेल तर अशा वेळी विम्याचा दावा नक्कीच फेटाळला जाईल.

अपघाताची माहिती देण्यास विलंब नको

विमा कंपन्या अपघातानंतर दावा दाखल करण्यासाठी तुम्हाला 48 तासांचा अवधी देते. जर आपण दावा नोंदविण्यास उशीर केला तर आपला दावा नोंदवण्यात येतो. याशिवाय तुम्ही विमा कंपनीला निर्धारित मुदतीत आवश्यक ती कागदपत्रे दिली नाहीत, तर तुमच्या दाव्याची नोंद होत नाही.

संबंधित बातम्या:

क्रिप्टोकरन्सीत येऊ देत चढ-उताराच्या लाटा, SIP ची जादू आणले गुंतवणुकीत बहार

PM Kisan : 31 मार्चच्या आत करा आधार केवायसी, अन्यथा रहावे लागेल अनुदानापासून वंचित

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास किती टॅक्स लागतो; जाणून घ्या परताव्यावरील टॅक्सचे संपूर्ण गणित

Follow Us
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी