पंतप्रधान आवास योजनेत मिळू शकते आणखी एक मोठी सुविधा, जाणून घ्या कोणती ते
पंतप्रधान आवास योजना(PMAY) ही केंद्र सरकारच्या विविध मिशनपैकी सर्वात प्रमुख आहे. याअंतर्गत, केंद्र सरकारने 2022 पर्यंत हा देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांना घरे देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
नवी दिल्ली : उद्योग संघटना सीआयआय(CII)ने रविवारी पंतप्रधान आवास योजना पुन्हा सुरू करावी आणि त्यात जीवन विमा सुविधा अनिवार्य करावी अशी मागणी सरकारकडे केली. ज्यांना पंतप्रधान आवास योजना(PMAY)चे कर्ज मिळते त्यांना सक्तीचा विमा देण्याची मागणीही करण्यात आली आहे. देशातील सर्व लोकांना घरे देण्याची सरकारने योजना आखली असून त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ही एक प्रभावी योजना आहे. यात, जर मुख्य कर्जदार (कर्ज घेणारी व्यक्ती) एखाद्या अपघातामुळे मरण पावली किंवा अपंग झाली तर त्याचे घराचे स्वप्न भंग होऊ नये. हे लक्षात घेता कर्जाबरोबरच जीवन विम्याचा लाभ देण्याची मागणीही सरकारकडून करण्यात आली आहे. (Another great feature that can be found in the Prime Minister’s Housing Scheme, know which one)
पंतप्रधान आवास योजना(PMAY) ही केंद्र सरकारच्या विविध मिशनपैकी सर्वात प्रमुख आहे. याअंतर्गत, केंद्र सरकारने 2022 पर्यंत हा देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांना घरे देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या ध्येयात कोणताही हलगर्जीपणा होऊ नये यासाठी सीआयआयने सरकारकडे गृहनिर्माण योजनेसह लाभार्थ्यांना जीवन विम्याचा लाभ देण्याची मागणी केली आहे. याअंतर्गत, मुख्य लाभार्थीचा मृत्यू झाला किंवा अपघाताचा बळी ठरला किंवा कायमस्वरुपी अपंग झाला, तरी त्याच्या घरातील सदस्यांना घर बांधण्यात कोणतीही अडचण येऊ नये. जीवन विम्याच्या पैशाने कुटुंबाचा खर्च भागवता येईल आणि घरही बांधता येईल या दृष्टीने जीवन विम्याची मागणी केली गेली आहे.
सीआयआयची मागणी काय आहे?
जर सरकारने सीआयआयची ही मागणी मान्य केली आणि पीएम आवास योजना जीवन विमासोबत परत जोडली गेली तर ती मोठी कामगिरी असल्याचे सिद्ध होऊ शकते. आतापर्यंत या योजनेत कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला अपंगत्वावर जीवन विमा किंवा कोणत्याही प्रकारच्या संरक्षणाची सुविधा नाही. कर्जासह अंगभूत विमा योजनेची तरतूद नाही. सीआयआय म्हणते की जर तुम्हाला पीएम आवास योजनेच्या कर्जासह विम्याचा लाभ मिळाला तर प्रतिकूल परिस्थितीत घराची किंमतही कायम राहील आणि घराचे बांधकाम थांबणार नाही.
जीवन विम्याचे फायदे
सीआयआयचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी म्हणाले, पीएमएवाय योजना पुन्हा सुरू करण्याची गरज आहे ज्याद्वारे पत संबंधित विमा किंवा मूलभूत जीवन विम्याचा लाभ प्रत्येक कर्जदारास देण्यात येऊ शकेल. ‘सर्वांसाठी आवास’ या उद्दीष्टात यामुळे कोणतीही अडचण उद्भवणार नाही. कर्ज घेणार्याच्या मृत्यूमुळे किंवा अपंगत्वामुळेही घराचे बांधकाम थांबणार नाही. कुटूंबांना घर मिळावे अशी काही व्यवस्था असायला हवी. जीवन विमा यात मोठी भूमिका बजावू शकते. देशात वेगवान विकासासाठी स्वस्त घरे देणे ही सर्वात मोठी गरज आहे. पीएम आवास योजनेंतर्गत जर कर्जदार मरण पावला तर घराचे बांधकाम थांबेल आणि कर्जाचा परिणाम वेगळा असेल. कुटुंबही अडचणीत येईल.
कोरोनामध्ये विम्याची अधिक आवश्यकता
कोरोनाच्या काळात लोक आणि त्यांचे जीवनमान यांच्यावर गंभीर परिणाम झाला आहे. दुसर्या लाटेमध्ये मृत्यूच्या प्रमाणात वेग वाढला. अशा परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक मदत देणे ही सर्वात मोठी गरज आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना पीएमएवाय योजनेद्वारे जीवन विम्याचा लाभ देऊन मोठा फायदा मिळू शकतो. योजनेंतर्गत सरकार हवे असल्यास जीवन विम्याचे प्रमाणित प्रीमियम निश्चित करू शकते. या माध्यमातून विमा कंपनी पीएम आवास योजनेतील लाभार्थ्यांना क्रेडिट कव्हर देऊ शकते. सुविधा अशी असावी की कर्जाच्या रकमेच्या बरोबरीचे कर्ज घेताना विमा संरक्षणाचा लाभ देण्यात यावा.
विम्याचा काय फायदा होईल
पीएमएवाय योजने अंतर्गत आता असे घडते की मालमत्तेच्या नावावर बँकेकडून कर्ज घेतले जाते. बॅंकांसाठी हे कर्ज सुरक्षित आहे कारण त्यांच्याकडे कर्जाच्या बदल्यात तारण स्वरूपात मालमत्ता आहे. जर कर्जदार मरण पावला तर कुटुंबाला कर्ज फेडावे लागते किंवा घर गमवावे लागते. दुसरीकडे, जर कर्जाची परतफेड करणारी व्यक्ती नसेल तर बँकांवरही परिणाम होईल आणि कर्जाची रक्कम एनपीएमध्ये जाऊ शकते, हे टाळण्यासाठी, जीवन विमा व्यवस्था केली जाऊ शकते, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे रक्षण होईल. (Another great feature that can be found in the Prime Minister’s Housing Scheme, know which one)
Realme किफायतशीर 5G स्मार्टफोनसह 20 नवे फोन लाँच करण्याच्या तयारीत#Realmehttps://t.co/Kd1PZxT0GA
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 25, 2021
इतर बातम्या
कित्येक महिन्यांपासून फरार असलेले गँगस्टार सलीम लंगडा, चिकना अखेर जेरबंद, एनसीबीची मोठी कारवाई