Investment : योग्य वयात दाखवा समजूतदारपणा, मोठा परतावा देईल ही गुंतवणूक योजना

Investment : योग्य वेळी गुंतवणूक केली तर पुढील अनेक जबाबदाऱ्या पेलताना हाती मोठे धन असते. त्यामुळे वाढत्या वयात येणारा ताण कमी होतो. पण त्यासाठी तरुणपणीच गुंतवणुकीचा समजूतदारपणा दाखवता येणे आवश्यक आहे.

Investment : योग्य वयात दाखवा समजूतदारपणा, मोठा परतावा देईल ही गुंतवणूक योजना
Follow us
| Updated on: Jun 29, 2023 | 6:14 PM

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून शेअर बाजाराकडे (Share Market) बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. शेअर बाजार हा जुगार नाही. योग्य अभ्यास करुन, तज्ज्ञाच्या सल्ल्याने केलेली गुंतवणूक तुम्हाला फायदा मिळवून देते. पण त्यासाठी सयंम बाळगणे आवश्यक आहे. डिजिटलयाझेशनमुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणे अत्यंत सोपे झाले आहे. कोरोना काळात तर शेअर बाजारात सर्वाधिक डिमॅट खाते उघडले गेले. पण ज्यांना अभ्यास न करता लागलीच दुप्पट कमाई हवी होती, ते सर्व निराश होऊन परतले. तर ज्यांनी गुंतवणुकीचे योग्य नियोजन केले, तो मोठा वर्ग आजही शेअर बाजारात गुंतवणूक करत आहे. काही जण सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट योजना म्हणजे एसआयपी(SIP) माध्यमातून गुंतवणूक करत आहे. त्यातून त्यांना फायदा पण होत आहे.

होऊ शकता करोडपती शेअर बाजारात हौसे, नवसे, गवसे सर्व प्रकारचे गुंतवणूकदार असतात. त्यांना वाटते बाजारात पैसा ओतला की लागलीच दहा पट नफा कमावता आला पाहिजे. किंवा एखाद्या गुंतवणुकीतून कोट्यवधी रुपयांचा परतावा मिळाला पाहिजे. पण त्यासाठी शेअर बाजारात सातत्य, सखोल अभ्यास, तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. अनेक गुंतवणूकदारांनी मोठा नफा कमावला आहे. तुम्ही जर योग्य वयात गुंतवणूक केली तर त्याचा फायदा मिळतो.

20 ते 30 वयात किती करावी गुंतवणूक तरुण वयात योग्य गुंतवणूक करणे आवश्यक आहे. 20 ते 30 वयात किती करावी असा प्रश्न अनेकांना पडतो. तज्ज्ञांच्या मते या वयात इक्विटीत 100 टक्के गुंतवणूक करणे आवश्यक आहे. पण दीर्घकाळासाठी ही गुंतवणूक असावी, असे तज्ज्ञ म्हणतात. दीर्घ कालावधीत अधिक फायदा मिळतो. जास्तीचा परतावा मिळतो. गुंतवणूकदारांचा अधिक फायदा होतो. तरुण वयातच गुंतवणूक करत असल्याने पुढे 20 ते 30 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते.

हे सुद्धा वाचा

30 ते 45 वयोगटातील गुंतवणूक जर तुमचे वय 30 ते 45 वर्षे असेल आणि शेअर बाजारात तुम्हाला 5-7 वर्षांचा अनुभव गाठिशी असेल तर चांगला परतावा मिळू शकतो. पण त्यासाठी पोर्टफोलिओत बदल करणे आवश्यक आहे. तुम्ही जर या वयात सर्वच पैसा इक्विटी फंडात गुंतवत असाल तर तुम्ही हा पॅटर्न बदलणे आवश्यक आहे. काही पैसा डेट स्कीम्समध्ये गुंतवणे आवश्यक आहे. वाढत्या वयानुसार, तुम्ही इक्विटीत कमी गुंतवणूक करुन ती इतर फंडाकडे वळवून फायदा मिळवू शकता. त्यासाठी तज्ज्ञाचा सल्ला आवश्य घ्या.

वयाच्या 50 वर्षानंतर अनेकांना या वयात निवृत्तीचे वेध लागतात. त्यामुळे या वयात केलेली गुंतवणूक ही उतार वयासाठी केलेली तरतूद असते. थकलेल्या शरिरात बळ नसते. गुंतवणूकदार मोठी रिस्क, जोखीम घेऊ शकत नाही. अशावेळी तुम्ही 65-75 रक्कम डेट म्युच्युअल फंडात आणि इतर रक्कम इक्विटी फंडात गुंतवू शकता. त्यातून उतार वयात मोठा फायदा मिळू शकतो.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचा स्वतःचा अभ्यास, मत महत्वाचे आहे. तसेच गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला घेणे जोखीम कमी करुन चांगल्या परताव्यासाठी आवश्यक ठरु शकतो.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.