AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank Account | बॅंक खातेधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यातील पैशांचे काय होते ?

तुम्ही बॅंकेत खाते उघडायला जाता तेव्हा तुम्हाला तुमच्यानंतर वारसदार म्हणून कुटुंबातील सदस्याचे नॉमिनी म्हणून नाव नोंदवावे लागते. तुमच्या पश्चात त्याला या खात्यातील पैसे मिळतात.

Bank Account | बॅंक खातेधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यातील पैशांचे काय होते ?
bank accountImage Credit source: socialmedia
| Updated on: Sep 21, 2023 | 5:37 PM
Share

नवी दिल्ली | 21 सप्टेंबर 2023 : वर्तमान काळात सर्व सुरळीत सुरु असल्याने प्रत्येकजण भविष्यात येणाऱ्या समस्यांचा विचार करीत नाही. परंतू आपल्या भविष्याचा विचार करुन वर्तमानात देखील तरदूत करणे गरजेचे असते आणि सर्व व्यवहार चोख राखणे गरजेचे असते. तुम्ही कधी विचार केला आहे की तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या पैशांचे काय होणार ? ते पैसे योग्य व्यक्तीच्या हाती पडावेत याची तरतूद करणे आणि  याशिवाय देखील अनेक प्रश्न असे आहेत ज्यांचे उत्तर तुम्हाला माहीती असणे गरजेचे आहे.

तुम्ही बॅंकेत खाते उघडायला जाता तेव्हा तुम्हाला तुमच्यानंतर वारसदार म्हणून कुटुंबातील सदस्याचे नॉमिनी म्हणून नाव नोंदवावे लागते. तुमचे पैशांचा वापर तुमच्यानंतर कोणाला करता यावा याची तरदूत तुम्ही हयात असतानाच करायला हवी. त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला हे माहिती असायला हवे की तुम्ही बॅंकेचे खाते उघडताना कोणाला नॉमिनी केले आहे की नाही. मृत्यूनंतर तुमच्या कुटुंबियांना तुमची सेव्हींग तेव्हाच मिळत जेव्हा तुम्ही तुमच्या वारसदाराचे नाव म्हणून नॉमिनी म्हणून दिले असेल.चला यासंदर्भात तुमच्या मनातील उत्तरे पाहूयात..

मृत्यूनंतर तुमच्या पैशांचे काय होणार ?

जेव्हा एखाद्या खातेधारकाचा मृत्यू होतो. तेव्हा बॅंका सर्व चौकशी करुन त्या खात्यातील पैसे खातेधारकाने नॉमीनी नोंदवलेल्या व्यक्तीच्या नावे ट्रान्सफर करीत असते.

नॉमिनी कोण असतो ?

नॉमिनी अशी व्यक्ती असते, ज्यांना खातेधारकांच्या मृत्यूनंतर खात्यातील एफडी बॅलन्सवर दावा करण्यासाठी नामित केलेले असते. बॅंक खाते किंवा एफडी खोलताना तुम्हाला एक नॉमिनी व्यक्तीचे नाव विचारले जाते. त्या व्यक्तीला खातेधारकाचे वारसदार म्हटले जाते.

नॉमिनीबद्दल कशी माहीती द्यावी ?

बॅंकेत खाते उघडताना फॉर्म भरताना तुम्हाला नॉमिनी व्यक्तीचे नाव आणि माहीती विचारली जाते. अर्जात त्या रकान्यात माहिती भरावी लागते. आपण आपल्या वारस असलेल्या व्यक्तीचे नाव त्यात भरावे. ज्यास तुमच्या पश्चात तुमचे पैसे त्यास मिळावेत अशी तुमची इच्छा आहे. मग ती तुमच्या कुटुंबातील सदस्य, जीवनसाथी, मुले, भाऊ आणि बहिण, मित्र वा कोणताही नातेवाईक असू शकतो.

जॉईंट अकाऊंट आणि नॉमिनी व्यक्ती

जॉईंट खाते असल्यास नॉमिनी व्यक्ती निवडण्यासाठी सर्व खातेधारकाच्या सहमतीची गरज असते. अशावेळी जॉईंट खात्यात नॉमिनी व्यक्तीला जोडण्यासाठी किंवा हटविण्यासाठी सर्व खातेधारकांची सहमती आवश्यकता असते. तसेच कधीही नॉमिनी बदल्याची तरतूद असते. त्यासाठी कोणतेही बंधन असते. तुम्ही बॅंकेत जाऊन किंवा ऑनलाईन देखील नॉमिनी बदलू शकता.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन