AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली ते मुंबई प्रवास अवघ्या 1 तास 22 मिनिटांत; कशी असते हायपरलूप ट्रेन?

Hyperloop project | हायपरलूप कंपनीच्या माहितीनुसार दिल्ली ते मुंबई हा 1153 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी फक्त सव्वा तास लागेल. याचा अर्थ सीएसएमटी ते कर्जत या ट्रेनच्या प्रवासापेक्षाही कमी वेळात मुंबई-दिल्ली अंतर कापता येईल.

दिल्ली ते मुंबई प्रवास अवघ्या 1 तास 22 मिनिटांत; कशी असते हायपरलूप ट्रेन?
हायपरलूप
| Edited By: | Updated on: Aug 29, 2021 | 8:57 AM
Share

नवी दिल्ली: गेल्या काही काळापासून विस्मृतीत गेलेल्या हायपरलूप प्रकल्पाची देशात पुन्हा नव्याने चर्चा रंगू लागली आहे. हायपरलूपमुळे दिल्ली ते मुंबई हा प्रवास 1 तास 22 मिनिटांत करता येऊ शकतो. गेल्या काही वर्षांपासून व्हर्जिन हायपरलूप (Virgin Hyperloop) कंपनीकडून परदेशात यासंदर्भात चाचण्या सुरु आहेत. या तंत्रज्ञानामुळे हजारो किलोमीटरचा प्रवास अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण होऊ शकतो. भारतामध्ये हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात आल्यास दळणवळणाच्या क्षेत्रात फार मोठी क्रांती होऊ शकते.

आगामी काळात महाराष्ट्रासह देशभरात हायपरलूप प्रकल्प उभारले जाऊ शकतात. हायपरलूप कंपनीच्या माहितीनुसार दिल्ली ते मुंबई हा 1153 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी फक्त सव्वा तास लागेल. याचा अर्थ सीएसएमटी ते कर्जत या ट्रेनच्या प्रवासापेक्षाही कमी वेळात मुंबई-दिल्ली अंतर कापता येईल.

मुंबई ते नागपूर प्रवास अवघ्या 35 मिनिटांत

हायपरलूप या अत्याधुनिक परिवहन प्रणालीच्या साह्याने मुंबई ते नागपूर किंवा पुणे ते नागपूर हे अंतर ताशी 700 मैल अधिक किंवा 1125 किमी वेगाने अवघ्या 35 ते 40 मिनिटांत कापता येऊ शकेल. तर मुंबई ते पुणे हे अंतर कापण्यासाठी अवघी 21 मिनिटं लागतील. फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्रात या प्रकल्पाची जोरदार चर्चा होती. मात्र, महाविकासआघाडीच्या काळात कोरोना व अन्य कारणांमुळे हायपरलूप प्रकल्प जवळपास बासनात गुंडाळला गेला आहे.

हायपरलूप म्हणजे नक्की काय?

हायपरलूप तंत्रज्ञानात प्रवासासाठी कॅप्सुलच्या आकाराच्या पॉडस असतात. या पॉडस निर्वात पोकळीतील एका ट्युबमधून प्रवास करतात. हायपरलूप तंत्रज्ञानानुसार ट्यूबमधील हवा शोषणासाठी ट्यूबच्या तोंडाला अजस्त्र कॉम्प्रेसर लावलेले असतात. त्यामुळे ट्युबमध्ये पोकळी निर्माण होऊन कॅप्सुल आणि रुळांमधील घर्षण संपुष्टात येते. त्यामुळे अत्यंत वेगाने प्रवास करता येऊ शकतो.

संबंधित बातम्या:

फडणवीसांना धक्का, हायपरलूप प्रकल्प ठाकरे सरकारने गुंडाळला

पुण्याचा तनय मांजरेकर ‘हायपरलूप’मध्ये बसणारा पहिला भारतीय

मुंबई-पुणे 31 मिनिटांत, फडणवीस सरकारची ‘हायपरलूप’ला मान्यता

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.