AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचा आपत्कालीन निधी आहे तर या चुका टाळा; नाही तर मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार

कोणताही अभ्यासू आणि भविष्याचा विचार करणारा जो आर्थिक सल्लागार असतो तो लोकांना आपत्कालीन निधी तयार करण्याचा नेहमीच सल्ला देतो. मात्र काही लोक वेगवेगळ्या कारणांमुळे यामध्ये अयशस्वी होत नाहीत. त्यासाठीच अ‍ॅक्सिस बँकेने महत्वाची ५ कारणे सांगितली आहेत.

तुमचा आपत्कालीन निधी आहे तर या चुका टाळा; नाही तर मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार
महत्वाची बचतImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 18, 2022 | 8:54 PM
Share

मुंबईः कोणतीही व्यक्ती भविष्यासाठी नियोजन करत असेल तर ती नेहमीच आपत्कालीन निधी म्हणजेच (Emergency fund) तयार करण्यासाठी प्रयत्न करतात. आणि अनेक आर्थिक सल्लागार (Financial advisor) आपत्कालीन निधी बद्दल लोकांना सल्ला देतात, आणि समोरील व्यक्तीकडे आपत्कालीन निधी आहे की नाही यावर ते हे त्यांच्या भविष्यातील आर्थिक स्थिती (Future Plan) ठरवतात. कोणत्याही व्यक्तीकडे इमर्जन्सी फंड असेल भविष्यात येणाऱ्या कोणत्याही अनपेक्षित खर्चाबरोबर ती व्यक्ती सामना करु शकतो. तसेच त्याद्ववारे तुम्ही तुमची इतर गुंतवणूकही करु शकता.

आपत्कालीन निधीचं हे वैशिष्ट्ये असूनही आपत्कालीन निधी तयार करण्यामध्ये अनेकजण अयशस्वी होतात. यासाठीच अ‍ॅक्सिस बँकेने 5 कारणे सांगितली आहेत..

आपत्कालीन निधी म्हणजे काय?

इमर्जन्सी फंड अर्थात आपत्कालीन निधी आहे तो ज्या व्यक्तीचा हा निधी असेल ती व्यक्ती कोणत्याही संकटाच्या वेळी तुमचा 3 ते 6 महिन्यांचा आवश्यक खर्च त्याद्ववारे केला जातो त्याला आपत्कालीन निधी म्हणतात. कारण काही खर्च हे तुम्ही टाळू म्हटला तरी टाळू शकत नाही किंवा ते कपातही करू शकत नाही. कधी तरी उत्पन्नाचा स्रोत काही काळ बंद असेल तर या निधीचाच महत्त्वाचा उपयोग होतो.

यामध्ये नोकरी जाणे, पगार कपात होणे किंवा गंभीर आजारपण, अपघात होणे यासाठी आपत्कालीन निधी स्वत:साठी तयार ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र काही वेळा नागरिकांची गरज असतानाही आपत्कालीन निधीसाठी प्रयत्न करु शकत नाही.

आपत्कालीन निधीसह केलेल्या सामान्य चुका

योग्य निधीचा अंदाज नसणे: आपत्कालीन निधी करताना अनेकांना वाटते की, गरजेपेक्षा कमी निधी जोडून आपत्कालीन निधी तयार केला आहे. किंवा ज्यावेळी अडचणी नाही तर संकटं येतात त्यावेळी त्यांचा हा निधी कमी पडतो आणि त्यांनी केलेली गुंतवणूक थांबवणे किंवा कर्ज घेतल्याशिवाया पर्याय राहत नाही. अ‍ॅक्सिस बँकेच्या मते, तुम्ही 3-6 महिन्यांसाठी अपरिहार्य खर्च काढता आणि त्याचाच वापर तुम्ही आपत्कालीन निधीसाठी करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये मुलांची फी, ईएमआय, हप्ते इत्यादींचा समावेश होऊ शकतो.

चुकीची गुंतवणूक: अनेक वेळा लोक दीर्घकालीन FD किंवा स्टॉक मार्केटसारखा पर्याय निवडतात, आणि आपत्कालीन निधी तयार करण्यासाठी चुकीची गुंतवणूक करतात. अ‍ॅक्सिस बँकेच्या म्हणण्यानुसार, आपल्या आयुष्यात आणीबाणी कधीही येऊ शकते, त्यामुळे गुंतवणूक करतानाही अशी गुंतवणूक करा की, ती कधीही तुम्ही थांबवू शकता. परतावा थोडा कमी असला तरी चालेल. त्याच वेळी, अशा पर्यायांमध्ये पैसे गुंतवणे योग्य नाही, जे जलद रोखले जाऊ शकतात परंतु कोणत्याही चढ-उतारात, तुमची संपूर्ण रक्कम बुडू शकतात. तुम्ही तुमचे इमर्जन्सी फंड बचत खात्यात (५० टक्के), शॉर्ट टर्म एफडी (३० टक्के) आणि लिक्विड फंड (२० टक्के) मध्ये ठेवू शकता.

गैर-आपत्कालीन खर्चासाठी वापरा: अ‍ॅक्सिस बँक सांगते की, आपत्कालीन निधी तुटण्याचे हे मुख्य कारण आहे. जेव्हा आपत्कालीन निधी तुमच्याकडे उपलब्ध असतो तेव्हा ती रक्कम इतर रकमेप्रमाणे हाताळता. म्हणजेच ती रक्कम तुम्ही प्रवासात किंवा इतर ठिकाणा खरेदी करण्यासाठी वापरता. त्यामुळे अ‍ॅक्सिस बँक सांगते की, आपत्कालीन निधी नेहमी तुम्ही तुमच्या रोजच्या खर्चापासून लांब ठेवा. आणि तुमच्याकडे अधिक रक्कम असेल ततर ती रक्कम तुम्ही अतिरिक्त रक्कमही म्हणूनही वापरु शकता.

वापर झाल्यानंतर नूतनीकरण करा: आपत्कालीन निधी उपलब्ध असला की, लोक तोच निधी वापरतात, मात्र त्यानंतर पुन्हा आपत्कालीन निधी तयार करण्यासाठी हलगर्जीपणा दाखवतात. त्यामुळे अ‍ॅक्सिस बँक सल्ला देते की एकदा का निधीचा वापर झाला आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारल्यावर आपत्कालीन निधी पुन्हा त्या-त्या मर्यादेपर्यंत तयार करा.

आपत्कालीन निधीचे पुनरावलोकन: सध्याच्या जगात कधी कुठला खर्च वाढेल सांगता येत नाही. कधी मुलांच्या शाळेची फी, तर कधी नव्या खरेदीसाठी EMI सुरु होणं त्यामुळे आपत्कालीन निधी पुन्हा भरणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या आपत्कालीन निधीचे वार्षिक आधारावर पुनरावलोकन करा आणि आवश्यक असल्यास ते वाढवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या

राज्यात होळी धुलिवंदनाचा उत्साह, राजू शेट्टी मविआ सोडणार? | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट

संजय राऊतांसह 6 खासदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार, यादीत राज्यातल्या बड्या नेत्यांची नावं

गुलाम नबी आझाद सोनिया गांधीच्या भेटीला! 5 राज्यातील लाजीरवाण्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.