नवी दिल्ली : एटीएमचा (ATM) वापर न करता अनेक जण बँकेत जाऊन रक्कम काढतात. त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.अशा ग्राहकांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. त्यांना आता केवळ पासबुक दाखवून बँकेतून रक्कम काढता येणार नाही. बँकेत रोखीतून व्यवहार (Bank Transaction) करण्यासाठी केंद्र सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. अर्थात हे नियम ग्राहकांच्या फायद्यासाठीच आहे. त्यामुळे ग्राहकांचे खाते तर सुरक्षित राहिलच. पण त्याची ओळख पटविणेही सोपे होईल. तुमच्या पासबुकवर (Passbook) आणि खोट्या स्वाक्षरीवर आता कोणीही बँकेतून रक्कम काढू शकत नाही.