AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ सरकारी संस्थेचा लोगो, नाव आणि घोषवाक्य तयार करा; केंद्र सरकारकडून 15 लाखांची ऑफर

Finance ministry | पहिल्या स्थानावरील व्यक्तीला पाच लाख रुपये, दुसऱ्या स्थानावरील व्यक्तीला तीन लाख रुपये आणि तिसऱ्या स्थानावरील व्यक्तीला 2 लाख रुपये मिळतील. याचा अर्थ या स्पर्धेत एकूण नऊ विजेते निवडले जातील.

'या' सरकारी संस्थेचा लोगो, नाव आणि घोषवाक्य तयार करा; केंद्र सरकारकडून 15 लाखांची ऑफर
अर्थ मंत्रालय
| Edited By: | Updated on: Aug 01, 2021 | 7:09 AM
Share

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून वेळोवळी अनेक उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमध्ये जिंकणाऱ्यांना पारितोषिकही दिले जाते. आताही केंद्रीय अर्थमंत्रालयाने अशाच एका स्पर्धेचे आयोजन केले आहे. डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्युशन या संस्थेचा लोगो, नाव आणि घोषवाक्य तयार करण्यासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव मागवले आहेत. या तिन्ही गोष्टींसाठी प्रत्येक 15 लाख रुपयांचे बक्षीस मिळेल.

बक्षीसाची रक्कम कशी मिळणार?

या स्पर्धेत लोगो, नाव आणि घोषवाक्य असे तीन विभाग आहेत. या तिन्ही विभागातून पहिल्या तीन क्रमांकाच्या व्यक्तींना बक्षीस दिले जाईल. पहिल्या स्थानावरील व्यक्तीला पाच लाख रुपये, दुसऱ्या स्थानावरील व्यक्तीला तीन लाख रुपये आणि तिसऱ्या स्थानावरील व्यक्तीला 2 लाख रुपये मिळतील. याचा अर्थ या स्पर्धेत एकूण नऊ विजेते निवडले जातील.

DFI म्हणजे काय?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदा अर्थसंकल्प सादर करताना डेवलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्युशन स्थापन करण्याची घोषणा केली होती. या माध्यमातून योजनांसाठी निधी पुरवला जाईल. आगामी काळात मोदी सरकार पायाभूत सुविधांवर 11 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे.

या स्पर्धेसाठी अर्ज कसा पाठवाल?

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी MyGov या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागेल. याठिकाणी स्पर्धेचे नियम आणि अटीही वाचायला मिळतील. 15 ऑगस्ट 2021 पर्यंत तुम्ही या स्पर्धेसाठी अर्ज करु शकता.

संबंधित बातम्या:

पीएम पीक विमा योजना: शेतकऱ्यांचे नुकसानाचे 2288.6 कोटी रुपयांचे दावे प्रलंबित, नेमकं कारण काय?

शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 2000 रुपये येणार, यादीतील नाव असे तपासा

निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याकडून पारंपारिक शेतीला फाटा, ‘ड्रॅगन फ्रूट’चा मळा बहरला, डॉक्टरसाहेब म्हणतात, ‘हेच पीक घ्या’

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.