AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC Scheme : योजनाच एकदम सुपरहिट! 54 लाख असे मिळतील

LIC Scheme : एलआयसीच्या अनेक योजनांपैकी ही योजना तुम्हाला मालामाल करेल. आयुष्याच्या संध्याकाळी तुम्हाला कसलीच चिंता राहणार नाही. 54 लाख रुपयांची तरतूद तुम्ही करु शकाल.

LIC Scheme : योजनाच एकदम सुपरहिट! 54 लाख असे मिळतील
| Updated on: May 16, 2023 | 8:15 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय जीवन विमा महामंडळाने (LIC) ग्राहकांसाठी अत्यंत लाभदायक योजना आणते. एलआयसीच्या जवळपास सर्वच वयोगटातील व्यक्तींसाठी योजना आहे. निवृत्तीनंतर व्याधी, आरोग्याच्या तक्रारी, महागडे उपचार, ऑपरेशन्स, औषधांसाठी मोठा खर्च येतो. पण गाठिशी मोठी जमापुंजी नसेल तर मोठा ताप होतो. त्यामुळे एलआयसीची ही योजना तुमच्या हिताची ठरेल. या योजनेत जीवन विमाधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यात येते. तर आयुष्याच्या संध्याकाळी विमाधारकाला मोठी रक्कम मिळते. दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवल्यास मॅच्युरिटी वेळी 54 लाख रुपयांची तरतूद तुम्ही करु शकाल. कोणती आहे ही योजना, तिचा काय आहे फायदा?

एलआयसी जीवन लाभ एलआयसी जीवन लाभ (LIC Jeevan Labh) योजना सुरक्षा आणि बचतीसाठी मोठी फायदेशीर आहे. ही योजना दोघांना पण मोठा फायदा मिळवून देऊ शकते. या योजनेत दरमहा बचत केल्यास मॅच्युरिटीवेळी एकरक्कमी पैसा मिळतो. या योजनेत तुम्हाला दरमहा 7,572 रुपयांची बचत करावी लागते. एलआयसी सरकारचा व्यावसायिक उपक्रम असल्याने यात पैसा बुडण्याचा कोणताही धोका नाही. इतर बचत योजनांपेक्षा यात व्याज तर मिळतेच पण जीवन विमा ही मिळतो. योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यावर 54 लाख रुपये मिळतात.

मृत्यूनंतर वारसांना पैसा जीवन विमाधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यात येते. तर आयुष्याच्या संध्याकाळी विमाधारकाला मोठी रक्कम मिळते. या योजनेत गुंतवणूकदारांना त्याच्या मनानुसार, योजनेचा हप्ता आणि कालावधी निवडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे भविष्यातील खर्चासाठी ही योजना मोठी मदत करु शकते.

असा मिळतो लाभ ही पॉलिसी खरेदीसाठी कमीतकमी 18 वर्ष आणि कमाल 59 वर्षांची अट आहे. जर एखाद्या व्यक्तीने 25 व्या वर्षी जीवन लाभ पॉलिसी खरेदी केली तर त्याला प्रति महिना 7,572 रुपये वा प्रति दिन 252 रुपये गुंतवणूक करावी लागेल. म्हणजे वर्षाला 90,867 रुपये जमा होतील. विमाधारक जवळपास 20 लाख रुपये जमा करेल. मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर विमाधारकाला 54 लाख रुपये मिळतील. तसेच विमाधारकाला इतर लाभ पण मिळतात.

योजनेची वैशिष्ट्ये काय या योजनेत 8 ते 59 वर्षे वयोगटातील कोणताही नागरिक गुंतवणूक करु शकतो. योजनेतंर्गत विमाधारक 10,13 आणि 16 वर्षांपर्यंत पैसा जमा करु शकतो. 16 ते 25 साली मॅच्युरिटीची रक्कम मिळेल. विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना रक्कम मिळते. जर या पॉलिसीचे सर्व प्रीमियम जमा केल्यास सर्व फायदे मिळतात.

Follow Us
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.