AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC Scheme : योजनाच एकदम सुपरहिट! 54 लाख असे मिळतील

LIC Scheme : एलआयसीच्या अनेक योजनांपैकी ही योजना तुम्हाला मालामाल करेल. आयुष्याच्या संध्याकाळी तुम्हाला कसलीच चिंता राहणार नाही. 54 लाख रुपयांची तरतूद तुम्ही करु शकाल.

LIC Scheme : योजनाच एकदम सुपरहिट! 54 लाख असे मिळतील
| Updated on: May 16, 2023 | 8:15 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय जीवन विमा महामंडळाने (LIC) ग्राहकांसाठी अत्यंत लाभदायक योजना आणते. एलआयसीच्या जवळपास सर्वच वयोगटातील व्यक्तींसाठी योजना आहे. निवृत्तीनंतर व्याधी, आरोग्याच्या तक्रारी, महागडे उपचार, ऑपरेशन्स, औषधांसाठी मोठा खर्च येतो. पण गाठिशी मोठी जमापुंजी नसेल तर मोठा ताप होतो. त्यामुळे एलआयसीची ही योजना तुमच्या हिताची ठरेल. या योजनेत जीवन विमाधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यात येते. तर आयुष्याच्या संध्याकाळी विमाधारकाला मोठी रक्कम मिळते. दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवल्यास मॅच्युरिटी वेळी 54 लाख रुपयांची तरतूद तुम्ही करु शकाल. कोणती आहे ही योजना, तिचा काय आहे फायदा?

एलआयसी जीवन लाभ एलआयसी जीवन लाभ (LIC Jeevan Labh) योजना सुरक्षा आणि बचतीसाठी मोठी फायदेशीर आहे. ही योजना दोघांना पण मोठा फायदा मिळवून देऊ शकते. या योजनेत दरमहा बचत केल्यास मॅच्युरिटीवेळी एकरक्कमी पैसा मिळतो. या योजनेत तुम्हाला दरमहा 7,572 रुपयांची बचत करावी लागते. एलआयसी सरकारचा व्यावसायिक उपक्रम असल्याने यात पैसा बुडण्याचा कोणताही धोका नाही. इतर बचत योजनांपेक्षा यात व्याज तर मिळतेच पण जीवन विमा ही मिळतो. योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यावर 54 लाख रुपये मिळतात.

मृत्यूनंतर वारसांना पैसा जीवन विमाधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यात येते. तर आयुष्याच्या संध्याकाळी विमाधारकाला मोठी रक्कम मिळते. या योजनेत गुंतवणूकदारांना त्याच्या मनानुसार, योजनेचा हप्ता आणि कालावधी निवडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे भविष्यातील खर्चासाठी ही योजना मोठी मदत करु शकते.

असा मिळतो लाभ ही पॉलिसी खरेदीसाठी कमीतकमी 18 वर्ष आणि कमाल 59 वर्षांची अट आहे. जर एखाद्या व्यक्तीने 25 व्या वर्षी जीवन लाभ पॉलिसी खरेदी केली तर त्याला प्रति महिना 7,572 रुपये वा प्रति दिन 252 रुपये गुंतवणूक करावी लागेल. म्हणजे वर्षाला 90,867 रुपये जमा होतील. विमाधारक जवळपास 20 लाख रुपये जमा करेल. मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर विमाधारकाला 54 लाख रुपये मिळतील. तसेच विमाधारकाला इतर लाभ पण मिळतात.

योजनेची वैशिष्ट्ये काय या योजनेत 8 ते 59 वर्षे वयोगटातील कोणताही नागरिक गुंतवणूक करु शकतो. योजनेतंर्गत विमाधारक 10,13 आणि 16 वर्षांपर्यंत पैसा जमा करु शकतो. 16 ते 25 साली मॅच्युरिटीची रक्कम मिळेल. विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना रक्कम मिळते. जर या पॉलिसीचे सर्व प्रीमियम जमा केल्यास सर्व फायदे मिळतात.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.