AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महागाईचा विस्टोफ! घाऊक महागाईने 9 वर्षातील उच्चांक गाठला, खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला!

सर्वसामान्य माणूस महागाईने हैराण झाला असतांना, घाऊक माहागाईने गेल्या नऊ वर्षातील उच्चांक गाठल्याचे वृत्त आहे. एप्रिल महिन्यातील घाऊक महागाईची आकडेवारी समोर आली आहे. एप्रिलमध्ये घाऊक महागाईचा दर 15.08 टक्क्यांवर पोहोचला, जो नऊ वर्षांतील सर्वोच्च पातळी आहे.

महागाईचा विस्टोफ! घाऊक महागाईने 9 वर्षातील उच्चांक गाठला, खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला!
| Edited By: | Updated on: May 17, 2022 | 3:19 PM
Share

मुंबई : भारतातील एप्रिल महिन्यासाठी घाऊक महागाईचा WPI डेटा समोर आला आहे. एप्रिलमध्ये घाऊक किंमत निर्देशांक (Wholesale price index) 15.08 टक्क्यांवर पोहोचला, जो 9 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर (At the highest level) आहे. मार्च महिन्यात घाऊक महागाई 14.55 टक्के होती. चलनवाढीचा दर बाजाराच्या अंदाजापेक्षा खूप जास्त आहे. गेल्या महिन्यात, किरकोळ महागाई दर मासिक आधारावर (On a monthly basis) 10.9 टक्क्यांवरून 11 टक्क्यांवर पोहोचली आहे. उत्पादनांसाठी महागाई 10.85% पर्यंत वाढली आहे. भाज्यांच्या घाऊक महागाईचा दर मार्च महिन्यात 23.24 टक्क्यांवरून 19.88 टक्के राहिला. मासिक आधारावर त्यात घट झाली आहे. बटाट्याची घाऊक महागाई 19.84 टक्के आणि कांद्याची 4.02 टक्क्यांवर घसरली. मार्च महिन्यात बटाट्याच्या घाऊक महागाईचा दर २४.६२ टक्के आणि कांद्याच्या घाऊक महागाईचा दर ९.३३ टक्के होता.

अन्नधान्याचे दरही वाढले

अन्नधान्य महागाई सातत्याने वाढत आहे. मार्च महिन्यात 8.71 टक्क्यांच्या तुलनेत एप्रिलमध्ये फंड चलनवाढ 8.88 टक्के होती. इंधन आणि वीज महागाईचा दर मार्च महिन्यात 34.52 टक्क्यांवरून 38.66 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ महागाईनेही 8 वर्षांचा उच्चांक गाठला आहे. किरकोळ महागाईनेही 8 वर्षांचा नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये किरकोळ महागाईचा दर ७.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. खाद्यपदार्थ आणि तेलाच्या किमती वाढल्याने महागाईत ही झेप दिसून आली आहे. किरकोळ महागाईची ही पातळी मे 2014 नंतरची सर्वोच्च पातळी आहे. सलग चौथ्या महिन्यात किरकोळ महागाई 6 टक्क्यांच्या पुढे गेली आहे. रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाई दराची कमाल मर्यादा ६ टक्के ठेवली आहे.

आरबीआयने ठरवलेल्या लक्ष्यापेक्षा अधिक

किरकोळ महागाईचा हा आकडा सलग चौथ्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे. रिझर्व्ह बँकेला सरकारतर्फे महागाई दर 2 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचे उद्दिष्ट दिले आहे. जानेवारी 2022 पासून किरकोळ महागाई दर 6 टक्क्यांच्या वर राहिला आहे. एप्रिलमध्ये खाद्यपदार्थातील महागाई दर 8.38 टक्क्यांवर पोहोचला आहे. हा दर मागील महिन्यात 7.68 टक्के होता आणि वर्षभरापूर्वी याच महिन्यात महागाईचा दर 1.96 टक्के होता.

शहरांपेक्षा खेड्यांमध्ये महागाईचा दर जास्त

आकडेवारीनुसार, मार्चमध्ये ग्रामीण भागातील महागाई 7.66 टक्के होती. एप्रिल 2021 मधील 3.75 टक्क्यांच्याच्या तुलनेत एप्रिल 2022 मध्ये खेड्यांमध्ये महागाई 8.38 टक्क्यांपर्यत वाढली आहे. तर मार्चमध्ये शहरांमधील महागाईचा दर ६.१२ टक्के होता. एप्रिल 2021 मधील 4.71 टक्क्यांच्या तुलनेत एप्रिल 2022 मध्ये 7.09 टक्के महागाई वाढली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.