AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएफ खाते बंद झाले? चिंता नको, आता पाचशे रुपये भरून पुन्हा सुरू करता येणार खाते

काही कारणांमुळे ज्यांचे पीएफ खाते बंद झाले आहे, अशा कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता दर महिन्याला केवळ पाचशे रुपये भरून, संबंधित कर्मचाऱ्यांना आपले खाते सुरू ठेवता येणार आहे. याबाबत लवकरच ईपीएफओकडून (EPFO) नवा नियम तयार करण्यात येणार आहे.

पीएफ खाते बंद झाले? चिंता नको, आता पाचशे रुपये भरून पुन्हा सुरू करता येणार खाते
EPFO
| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 1:52 PM
Share

नवी दिल्ली : काही कारणांमुळे ज्यांचे पीएफ खाते बंद झाले आहे, अशा कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता दर महिन्याला केवळ पाचशे रुपये भरून, संबंधित कर्मचाऱ्यांना आपले खाते सुरू ठेवता येणार आहे. याबाबत लवकरच ईपीएफओकडून (EPFO) नवा नियम तयार करण्यात येणार आहे. याचा सर्वाधिक फायदा हा अशा कर्मचाऱ्यांना होऊ शकतो, ज्यांचे पीएफ खाते नोकरी सुटल्यानंतर बंद झाले आहे.

‘या’ कर्मचाऱ्यांना होणार फायदा 

सरकारी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच ईपीएफओकडून नवा नियम लागू होण्याची शक्यता आहे. नवा नियम लागू  झाल्यानंतर ज्यांचे पीएफ खाते बंद आहे, किंवा संबंधित व्यक्ती कोणत्याही नोकरीला नाही, अशा कर्मचाऱ्यांना आपले पीएफ खाते सुरू ठेवता येणार आहे. पीएफ खाते सुरू ठेवण्यासाठी संबंधित व्यक्तीला दर महिन्याला पाचशे रुपये किंवा आपल्या एकूण मासिक उत्पन्नातला तेरावा हिस्सा पीएफ खात्यात जमा करावा लागेल.

केव्हा येणार नवा नियम ?

मिळालेल्या माहितीनुसरा सध्या जे व्यक्ती पीएफच्या योजनेतून बाहेर पडले आहेत, अशा व्यक्तींची एकूण पीएफची रक्कम त्यावर मिळणारे व्याज आणि इतर फायदे अशा गोष्टींचा अभ्यास सध्या ईपीएफओकडून सुरू आहे. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. ईपीएफओकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार  2018-20 या दोन वर्षांमध्ये तब्बल 48 लाख लोकांचे पीएफ खाते बंद झाले आहेत. कोरोना.महामारीच्या काळात अनेकांचे रोजगार गेले होते. त्यामुळे या संख्येत आणखी भर पडली आहे.

संबंधित बातम्या 

कच्च्या तेलाचे भाव घसरले; जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर

Omicron Effect: सोन्याच्या भावात तेजी, जाणून घ्या गुंतवणुकीबद्दल तज्ज्ञ काय सांगतात?

पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवा पैसे, आपल्या मुलीचे भविष्य करा अधिक सुरक्षीत

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.