AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पती-पत्नी दोघांनाही पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात का, जाणून घ्या सर्वकाही

PM Kisan Yojna | पती-पत्नी दोघांनी पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत अर्ज केल्यास त्यांना लाभ मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होतो. अशा परिस्थितीत पती-पत्नीपैकी कोणीही पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. योजनेचा लाभ फक्त एकाच व्यक्तीला मिळतो.

पती-पत्नी दोघांनाही पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात का, जाणून घ्या सर्वकाही
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Nov 03, 2021 | 12:50 PM
Share

नवी दिल्ली: तुम्ही PM किसान (PM KISAN) योजनेचे लाभार्थी असाल तर ही तुमच्यासाठी कामाची बातमी असू शकते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना मोदी सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून सुरू केली. या योजनेंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते. दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये (पीएम किसान हप्ता) हस्तांतरित केले जातात. आतापर्यंत 9 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले गेले आहेत, लवकरच 10वा हप्ता (PM किसान 10वा हप्ता) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल.

पती-पत्नी दोघांनी पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत अर्ज केल्यास त्यांना लाभ मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होतो. अशा परिस्थितीत पती-पत्नीपैकी कोणीही पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. योजनेचा लाभ फक्त एकाच व्यक्तीला मिळतो. जर दोघांनी अर्ज केला असेल. जर मदतीच्या रकमेचा लाभ मिळाला असेल तर पती-पत्नीपैकी एकाला पैसे परत करावे लागतील.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो योजनेचा फायदा?

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत, ज्यांच्याकडे दोन हेक्टर म्हणजे 5 एकर लागवडीयोग्य शेती आहे त्यांनाच त्याचा लाभ मिळतो. आता सरकारने धारण मर्यादा रद्द केली आहे. शेतीयोग्य जमीन कोणाच्या नावावर आहे, त्यांना पैसे मिळतात, पण जर कोणी आयकर रिटर्न भरला तर त्याला पीएम किसान सन्मान निधीतून बाहेर ठेवले जाते.

पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता कधी मिळणार?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या दहाव्या हप्त्याअंतर्गत 15 डिसेंबर 2021 पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये येणे अपेक्षित आहे. मात्र, मोदी सरकारने यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला PM किसान सन्मान निधी अंतर्गत नोंदणी (PM KISAN Registration) करावी लागेल.

पंतप्रधान किसान योजनेच्या नियमांत बदल

मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. ही योजना सुरु झाल्यापासून अनेक बोगस शेतकरी योजनेचे पैसे लाटत असल्याचा प्रकार समोर आला होता. हा गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या नियमांत काही बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी रेशनकार्ड अनिवार्य केले आहे. त्यानुसार लाभार्थी कुटुंबांना आपल्या रेशनकार्डसह आधार कार्ड, बँक पासबूक आणि PM-KISAN संकेतस्थळावरील घोषणापत्र इत्यादी कागदपत्रे जमा करावी लागतील.

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांना आता विनातारण 1.60 लाखांचे कर्ज मिळणार, जाणून घ्या सर्वकाही

योजना शेतकऱ्यांच्या हिताची : प्लास्टिक मल्चिंगचे महत्व अन् 50 टक्के अनुदानाचा ‘असा’ घ्या लाभ…!

अनियमितता टाळण्यासाठी पीएम किसान योजनेत अणखीन बदल, अन्यथा मिळणार नाहीत पैसे

Follow Us
काळाचा घाला! 15 प्रवाशांची कार विहिरीत; अन् पुढे जे झालं.....
Solapur | काळाचा घाला! 15 प्रवाशांची कार विहिरीत; अन् पुढे जे झालं.....
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...