AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EWS आरक्षणाबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता; वार्षिक उत्पन्नाची अट 5 लाखांपर्यंत कमी होणार?

आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या निकषावर आरक्षण दिले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून वार्षिक उत्पन्नाची मर्यादा कमी करण्याचा विचार सरकारदरबारी सुरू आहे. सध्या ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखांपर्यंत आहे, अशा सर्वांणाचा आर्थिकदृष्या मागास वर्गाचा लाभ मिळू शकतो.

EWS आरक्षणाबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता; वार्षिक उत्पन्नाची अट 5 लाखांपर्यंत कमी होणार?
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 6:40 AM
Share

नवी दिल्ली: आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या निकषावर आरक्षण दिले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून वार्षिक उत्पन्नाची मर्यादा कमी करण्याचा विचार सरकारदरबारी सुरू आहे. सध्या ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखांपर्यंत आहे, अशा सर्वांणाचा आर्थिकदृष्या मागास वर्गाचा लाभ मिळू शकतो. मात्र आता आर्थिक उत्पन्नाची ही मर्यादा सरकार आठ लाखांहून पाच लाखांवर आणण्याच्या विचारात आहे. असे झाल्यास याचा फटका अनेकांना बसू शकतो. त्यामुळे आता सरकार आर्थिक उत्पन्नाबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्याचा नियम काय आहे?

ज्या लोकांचे उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा अधिक नाही, अशा लोकांचा समावेश सध्याचा नियमानुसार हा आर्थिक मागास वर्गामध्ये होतो. अशा लोकांसाठी सरकारी नोकरी आणि शैक्षणीक संस्थांमध्ये दहा टक्के आरक्षणाची तरतुद करण्यात आली आहे. मात्र उत्पन्नावरून सध्या अनेकजण प्रश्न निर्माण करत आहेत. तसेच उत्पन्नाची ही सीमा कमी असावी अशी मागणी देखील होत आहे. आता या प्रकरणावर सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी उत्पन्नाची सीमा किती असावी या करता केंद्र सरकारकडून देखील एका समितीचे गठण करण्यात आले आहे. त्यामुळे आता नेमका निर्णय काय घेतला जणार? याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

91 टक्के लाभार्थ्यांचे उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी

दरम्यान आर्थिकदृष्ट्या मागास म्हणून लाभ मिळवलेल्या व्यक्तींच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास असे दिसून येते की, यातील अनेक जणांच उत्पन्न हे पाच लांखाच्या आतच आहे. 2020 मध्ये झालेल्या नीट परीक्षेमध्ये ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला त्यातील 91 टक्के व्यक्ती असे होते की, ज्यांचे उत्पन्न हे पाच लाखांपेक्षा कमी होते. तसेच त्यातील 71 टक्के लोकांचे उत्पन्न हे तर दोन लांखापेक्षा देखील कमी आहे. तर केवळ तीन ते चार टक्के लोकांचेच उत्पन्न हे सहा ते आठ लाखांदरम्यान होते. त्यामुळे आर्थिक मागास वर्गाचा लाभ घेण्यासाठी उत्पान्नाची मर्यादा आठ लांखावरून पाच लांखापर्यंत आणावी अशी मागणी आता होऊ लागले आहे. सरकारकडून याप्रकरणात सल्ला देण्यासाठी एका पॅनलची देखील निर्मिती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Vodafone Idea चे नवीन प्रीपेड प्लॅन्स लाँच, Airtel, Jio ला टक्कर, जाणून घ्या बेनेफिट्स

‘या’ कारणांमुळे बँकांच्या खासगीकरणाचा निर्णय लांबणीवर; सरकार काय भूमिका घेणार?

साखर कारखान्यांसाठी गोड बातमी! मिश्रित इथेलॉनवरील जीएसटीत 13 टक्क्यांनी कपात

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक