AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RD Vs SIP : आरडी की एसआयपी, कोण करेल पाच वर्षांत मालामाल

RD Vs SIP : गुंतवणूक करताना ती डोळसपणे करणे फायद्याची ठरते. पारंपारिक गुंतवणूक पद्धतीपेक्षा म्युच्युअल फंड किती फायद्याचा ठरतो. किती मोठा फायदा होतो, गणित काय सांगते.

RD Vs SIP : आरडी की एसआयपी, कोण करेल पाच वर्षांत मालामाल
| Updated on: Jul 08, 2023 | 4:18 PM
Share

नवी दिल्ली : 1 जुलैपासून टपाल कार्यालयाने आवर्ती ठेव योजना (Recurring Deposit Scheme) , आरडीच्या व्याजदरात वाढ केली आहे. आता या सरकारी गुंतवणूक योजनेवर 6.5 टक्क्याने व्याज दर मिळले. यापूर्वी हा व्याजदर 6.2 टक्के होता. पोस्ट खात्यातील (Post Office) आरडी मध्ये गुंतवणूक आता फायद्याची ठरली आहे. पोस्ट खात्यातील आरडी 5 वर्षांसाठी असते. या योजनेत हमीपात्र परतावा मिळतो. तसेच ही गुंतवणूक जोखीममुक्त तर आहेच पण केंद्र सरकार तुमच्या गुंतवणुकीची हमी घेते. तर म्युच्युअल फंडात (Mutual Fund) आता SIP द्वारे गुंतवणुकीचा पर्याय सर्रास वापरण्यात येतो. या गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळतो. पण किती परतावा मिळेल याची कोणतीच हमी नसते. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारावर आधारीत असते. गुंतवणूक करताना ती डोळसपणे करणे फायद्याची ठरते. पारंपारिक गुंतवणूक पद्धतीपेक्षा म्युच्युअल फंड किती फायद्याचा ठरतो. किती मोठा फायदा होतो, गणित काय सांगते.

5000 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती फायदा जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये दर महिन्याला 5000 रुपयांची आरडी सुरु केली तर एका वर्षात तुम्ही 60,000 रुपये आणि 5 वर्षांत एकूण 3,00,000 रुपयांची गुंतवणूक कराल. 6.5 टक्के व्याजाच्या आधारे या नियोजीत गुंतवणुकीवर तुम्हाला एकूण 54,957 रुपये व्याज मिळेल. मॅच्युरिटीवेळी तुम्हाला व्याज आणि मुळ रक्कम मिळून एकूण 3,54,957 रुपये परतावा मिळेल.

5000 रुपयांच्या SIP वर किती परतावा ? म्युच्युअल फंडात SIP द्वारे अथवा एकरक्कमी भरुन गुंतवणूक करता येते. तुम्ही दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केली तर आवर्ती ठेव योजने इतकीच रक्कम जमा होईल. पण याठिकाणी परताव्याचे गणित बदलून जाते. एसआयपीत सरासरी 12 टक्केप्रमाणे परतावा मिळतो.

परताव्याचे गणित बदलणार एकूण 3,00,000 रुपये जमा होतील. त्यावर 12 टक्के व्याज मिळेल. त्यानुसार, व्याजापोटी 1,12,432 रुपये मिळतील. मुळ रक्कम आणि व्याजाचा एकत्रित विचार केला तर 5 वर्षांत एकूण 4,12,432 रुपये परतावा मिळेल. गणितानुसार, आरडीपेक्षा एसआयपीत दुप्पट परतावा मिळेल. विशेष म्हणजे सरासरीपेक्षा म्युच्युअल फंडात अधिकचा परतावा मिळू शकतो.

ही गोष्ट ठेवा ध्यानात पोस्टाच्या आरडीत तुम्हाला सलग गुंतवणूक करावी लागते. ती अचानक बंद करता येत नाही. कालावधी पूर्ण होईपर्यंत ती सुरु ठेवावी लागते. तीन वर्षानंतर तुम्ही आरडी बंद करु शकता. पण त्यावेळी व्याजदराचा फटका बसतो. तुम्हाला आरडीच्या व्याजदराप्रमाणे नाही तर नियमीत बचत खात्यावरील व्याजदरानुसार व्याज मिळते. इथे तुमचे नुकसान होते. एसआयपी तुम्ही कधी पण बंद करु शकता. ती रक्कम न काढता कायम ठेवली तरी त्यावर काही वर्षांत चांगला परतावा मिळतो.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.