AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँकेत गॅरंटर होऊन तुम्ही फसला आहात का? मग गॅरंटरमधून ‘अशी’ करून घ्या आपली सुटका

अनेकदा आपल्यावर देखील एखाद्या नातेवाईकांसाठी किंवा मित्रासाठी गॅरंटर राहण्याची वेळ येते. अशा परिस्थितीमध्ये जर संबंधित व्यक्तीने कर्ज भरले नाही तर बँक तुमच्याकडे विचारणा करू शकते. मात्र अशा परिस्थितीमध्ये घाबरून न जाता तुम्ही बँकेत जाऊन रितसर स्वता:ची गॅरंटरमधून सुटका करून घेऊ शकता.

बँकेत गॅरंटर होऊन तुम्ही फसला आहात का? मग गॅरंटरमधून 'अशी' करून घ्या आपली सुटका
आरबीआय बँक
| Updated on: Feb 13, 2022 | 5:30 AM
Share

मुंबई : अनेकदा आपल्या जवळच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना (friends) अर्जंट पैशांची (money) गरज असते. पैशांची गरज लागल्याने ते बँकेकडून कर्ज घेतात. कर्ज घेताना बँक (bank) त्यांचा सर्व तपशील तपासते. जसे की संबंधित व्यक्तीचा सीबील स्कोर, त्याची सॅलरी किती आहे. त्याने आधी काही कर्ज घेतले आहे का? तो नियमित आयटीआर भरतो का अशा सर्व गोष्टी चेक केल्या जातात आणि मगच त्याला कर्ज मंजूर केले जाते. मात्र कर्ज मंजूर करताना बँकेला दोन गॅरंटरची देखील आवश्यकता असते. समजा कोणत्याही कारणाने संबंधित व्यक्तीने कर्जाची परतफेड केली नाही तर त्या कर्जाची जबाबदारी ही गॅरंटरची असते. कर्जाबाबत बँक गॅरंटरकडे चौकशी करू शकते. अनेकदा आपल्यावर देखील एखाद्या नातेवाईकांसाठी किंवा मित्रासाठी गॅरंटर राहण्याची वेळ येते. अशा परिस्थितीमध्ये जर संबंधित व्यक्तीने कर्ज भरले नाही तर बँक तुमच्याकडे विचारणा करू शकते. मात्र अशा परिस्थितीमध्ये घाबरून न जाता तुम्ही बँकेत जाऊन रितसर स्वता:ची गॅरंटरमधून सुटका करून घेऊ शकता. त्यासाठी नेमकं काय करावे लागते हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

बँकेकडे रितसर अर्ज करा

तुम्ही जर एखाद्या मित्रासाठी किंवा नातेवाईकाच्या कर्जासाठी गॅरंटर बनला असाल आणि त्याने कर्ज भरण्यास टाळाटाळ केली तर अशा परिस्थितीमध्ये बँक गॅरंटरला जबाबदार धरते. मात्र अशा परिस्थितीमध्ये घाबरून जाऊ नका. अशा वेळी तुम्ही बँकेत जाऊन रितसर अर्ज करू शकता. बँकेला आपण गॅरंटर राहू इच्छित नाही असे सांगा. तसा अर्ज बँकेकडे सादर केल्यास तुमची या प्रकरणातून सुटका होऊ शकते. अशावेळी कर्जदार व्यक्तीला बँक गॅरंटर म्हणून दुसरा व्यक्ती शोधण्याचा सल्ला देते.

परदेशात नोकरी लागल्यास

तुम्हाला जर परदेशात नोकरी लागली असेल, तरी देखील तुम्ही गॅरंटरमधून तुमची सुटका करू शकता. तुम्हाला परदेशात नोकरी लागली आहे, याबाबतची माहिती संबंधित बँकेला द्या. तुमच्या नोकरीसंदर्भातील कागदपत्रे बँकेत सादर करा. आणि गॅरंटरमधून नाव काढून टाकण्याची विनंती बँकेला करा. तुमच्या विनंतीनुसार बँक तुमची गॅरंटरमधून मुक्तता करते.

नोकरी गमवल्यास

तुम्ही जर तुमची नोकरी गमावली असेल, तर अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही बँकेकडे गॅरंटर न राहण्याबद्दल अर्ज करू शकता. नोकरी गेल्याचा एखादा पुरावा संबंधित बँकेकडे सादर करा. गॅरंटर न राहण्याबद्दलचा अर्ज बँकेंकडे सादर करा. अशा परिस्थितीमध्ये बँक तुमची गॅरंटरमधून सुटका करते.

संबंधित बातम्या

भारतातील सर्वात मोठा बँकिग घोटाळा, स्टेट बँकसहित 28 बँकांना चुना; 22 हजार कोटींचा फेरफार!

ONGC मालामाल, तेल-गॅस भाववाढ पथ्यावर; थेट नफा 8 हजार कोटी!

पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल सव्वाशेपार? पहा अर्थमंत्री कराड काय म्हणतात

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली