मुंबई : भारतातील सगळ्यात मोठा समुद्री महामार्गाची(Mumbai Trans Harbour Link) ओळख असणारा शिवडी ते नवी मुंबई पर्यंतचा समुद्री महामार्गाचे(Shivdi-Nhavasheva Sea Bridge ) काम 80% पूर्ण झाले आहे. याची लांबी ही जवळपास 22 km इतकी आहे. 600 कोटींचा हा प्रकल्प आहे. याचं कामकाज जे आहे ते 80% पूर्ण झालेला आहे आणि येत्या काही काळामध्ये हा समुद्री महामार्ग जो आहे तो पूर्णपणे बांधून लोकांसाठी खुला केला होणार आहे. त्यानंतर शिवडी पासून म्हणजे मुंबईपासून नवी मुंबईला जोडणारा हा समुद्र महामार्ग तयार झाल्यामुळे मुंबईकराच्या विकासामध्ये तितकेच भर पडणार आहे. शिवाय नवी मुंबई रायगड या परिसरातल्या लोकांना सुद्धा तितकाच त्याचा फायदा होणार आहे. 22 km चा हा पूर्ण समुद्री महामार्ग आहे. आज आदित्य ठाकरे यांनी याची पाहणी केली. यापूर्वी सुद्धा महाविकास आघाडी सरकार ज्यावेळी होतो त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या प्रोजेक्टची पाहणी केलेली होती.