तेव्हाच्या सरकारनं अतिरेकी याकुबला सन्मान का दिला, समुद्रात दफन का केलं नाही, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. सणावाराला राजकारण करणं ही भाजपची घाणेरडी सवय आहे. निवडणुका आल्याने काहीतरी घडवण्याचा डाव आहे, असा आरोप आदित्य ठाकरेंनी याकुबच्या कबरीवरून केला आहे.