Ajit Pawar : मागच्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आपण औरंगाबाद, संभाजीनगर, धर्मवीर, स्वराज्यरक्षक यातच गुंतून पडत आहोत. दुसऱ्या विषयात नाक खुपसायच्या ऐवजी चांगलं वातावरण निर्माण करायला हवं. समाजात सलोख्याचं वातावरण तयार व्हायला हवं. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत”, असं अजित पवार म्हणालेत.