आम्ही पक्ष बदलावा म्हणून आम्हाला त्रास दिला जातोय. याआधी आपण पाहिलं आहे की ज्या ज्या लोकांवर किरीट सोमय्या यांनी आरोप केले ते नेते पुढे भाजप आणि शिंदेगटात गेले. नारायण राणेंपासून यशवंत जाधव यांच्यापर्यंत सगळ्यांनी दबावाला बळी पडून पक्षांतर केलं. सोमय्यांना वाटतं की अनिल परब यांना त्रास दिला म्हणजे उद्धव ठाकरेंना त्रास दिला. त्यामुळे आरोप केले जात आहेत. पण असल्या दाबावाला आम्ही घाबरत नाही, असं अनिल परब म्हणालेत. किरीट सोमय्या आणि अनिल परब यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे.