बीड (परळी) : कोरोना महामारीने गेल्या दोन वर्षांपासून पंढरपूरच्या आषाढी वारीवर बंदी आली आहे. पायी दिंड्या, पालखी सोहळे, भजनानंद, हरिनामाच्या गजराने दुमदुमून जाणारे वातावरण हे सर्व बंद झाले. परळीत देखील हे भक्तीमय वातावरण शांत झालं आहे. त्यामुळे सर्वच भक्तांना आपल्या विठूरायाला भेटण्याची आस लागली आहे. परळी पंचक्रोशीत वारीमार्गावर या दिंड्यांचे स्वागत करण्याची मोठी परंपरा जपली गेलेली आहे. पण या सर्वांपासून वारकरी मुकला आहे. त्यामुळे आता या भक्ताला आपल्या विठुरायाच्या भेटीची आस लागली आहे. (Ashadhi Wari 2021 ban on Palkhi ceremonies due to corona)