VIDEO : Ashish Shelar | OBC आरक्षण निवडणुक, महाराष्ट्र सरकारच्या टाकरे सरकारचं पाप
वांद्रे बँडस्टँड घोटाळ्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारवर आरोप केला आहे. वांद्रे पश्चिम बॅन्डस्टँड परिसरातील ताज हॉटेल शेजारी असणाऱ्या सरकारी मालकीचा भूखंड बिल्डरच्या घशात घालून सुमारे एक नव्हे तर 3 हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे.
वांद्रे बँडस्टँड घोटाळ्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारवर आरोप केला आहे. वांद्रे पश्चिम बॅन्डस्टँड परिसरातील ताज हॉटेल शेजारी असणाऱ्या सरकारी मालकीचा भूखंड बिल्डरच्या घशात घालून सुमारे एक नव्हे तर 3 हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे या पंचतारांकित जागेवर “एसआरए” योजना दाखवून एसआरए योजनेतील लाभ व एफएसआय बिल्डरला देण्यात येणार असल्याचा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच आघाडी सरकार हे ‘ठग्ज् ॲाफ महाराष्ट्र’ असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. पंचतारांकित जागेवर “एसआरए” दाखवून सरकारकडून एफएसआयची खैरात करण्यात आली आहे. मंत्रालयातील 6 व्या माळ्यावर बसणाऱ्या कुठल्यातरी मंत्र्यांच्या आदेशाशिवाय हे शक्य नाही.
