मुंबई : पंजाबमधील (Punjab) स्थानिक पक्षांना नाकारत, तसंच प्रस्थापितांविरोधात मतदान (Voting) झाल्याचा कौल सुरुवातीच्या कलांमध्ये दिसून आला आहे. शेतकरी (Farmers) आंदोलन, पंजाबमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेली चूक आणि त्यावरुन गाजलेलं राजकारण या सगळ्यामुळे पंजाबच्या निवडणुका गाजल्या होत्या. दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीही डोकं वर काढू लागली होती. या सगळ्या घडामोडींत आज जे निकाल हाती आले आहेत, त्या अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान यांच्या नेतृत्त्वाखाली पंजाबामध्ये निवडणुका लढवल्या होत्या. भगवंत मान हे स्टॅंडअप कॉमेडियन म्हणून सगळ्यांना माहीत आहेत. त्यांच्या राजकीय इन्ट्रीवरुनही बरीच चर्चा रंगली होती.