Special Report | सनई-चौघड्यांएवजी दगडफेकीनं लग्न चर्चेत

| Updated on: Jun 18, 2022 | 10:29 PM

या दगडफेकीमुळे नवरदेवाकडील 7 ते 8 जण नातेवाईकांना दुखापतही झाली आहे.या घटनेची सर्व माहिती नातेवाईकांनी पोलिसांना देत आपला जीव वाचवत नवरदेवाकडील नातेवाईकांनी थेट मुंबई गाठली.

Follow us on

मुंबईमधील विक्रोळी विभागातील नवरदेवाचे वऱ्हाड औरंगाबादमधील गांधेली गावात नवरीकडे लग्नसोहळ्यासाठी गेले होते. दोन्हीकडील पाहुण्यांच्या उपस्थित थाटामाटात नवरानवरीवर अक्षताही पडल्या. मात्र काही वेळेतच काही तरी कारण घडले आणि वादाची ठिणगी पडली. नवरदेवाकडील व नवरीकडील नातेवाईक यांच्यामध्ये वाद सुरू झाला आणि तो इतका विकोपाला गेला की, नवरदेवाकडील आलेल्या वऱ्हाडी मंडळींची गाडीही फोडण्यात आली. नवरदेवाकडील पाहुण्यांच्या गाडीवरच दगडफेक करून औरंगाबादकर थांबले नाहीत त्यांनी थेट दगडफेक करायला सुरुवात केली. या दगडफेकीमुळे नवरदेवाकडील 7 ते 8 जण नातेवाईकांना दुखापतही झाली आहे.या घटनेची सर्व माहिती नातेवाईकांनी पोलिसांना देत आपला जीव वाचवत नवरदेवाकडील नातेवाईकांनी थेट मुंबई गाठली.