बाबासाहेब पुरेंदरे हे काय फिलोसॉफर नव्हते – जितेंद्र आव्हाड

| Updated on: May 02, 2022 | 11:29 AM

बाबासाहेब पुरेंदरे हे काय फिलोसॉफर नव्हते. जसा या जगात गांधीवाद आहे. परदेशात मार्क्सवाद आहे. जसे जगामध्ये आंबेडकर राईटस् आहेत. तसा अजून पुरेंदरेवादी असा शब्द कुठे आलेला नाही.

Follow us on

बाबासाहेब पुरंदरेंचा मृत्यू झाल्यानंतर आम्ही त्या विषयावर आम्ही काहीच बोललो नाही. माणूस जिवंत असताना त्याचा विचाराशी संघर्ष करायचा असतो. बाबासाहेब पुरेंदरे हे काय फिलोसॉफर नव्हते. जसा या जगात गांधीवाद आहे. परदेशात मार्क्सवाद आहे. जसे जगामध्ये आंबेडकर राईटस् आहेत. तसा अजून पुरेंदरेवादी असा शब्द कुठे आलेला नाही. असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

काल झालेल्या औरंगाबादमधील सभेत राज ठाकरेंनी शरद पवारांवरती जोरदार टीका केली. तसेच विवि
मुद्द्यांना घेऊन त्यांना महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले होते. त्याला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कधी चैत्यभूमीवर गेला आहात का ? त्यांच्या लोकांबद्दल कधी बोलला आहात का ? देवळात जाताना आम्ही कधी कॅमेरे घेऊन जात नाही अशा टोला देखील त्यांनी लगावला आहे. राज ठाकरेंच्या कालच्या भाषणातील अनेक मुद्द्यांवरती जितेंद्र आव्हाड यांनी टीका सुध्दा केली आहे.