Breaking | रेवदांडाच्या समुद्रात बार्ज बुडाला, 15 खलाशांना वाचवण्यात यश

| Updated on: Jun 17, 2021 | 5:12 PM

महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात खराब हवामान आणि समुद्राच्या खडकाळ परिस्थितीत बचावकार्य चालू असून, आयसीजी हेलिकॉप्टरने एमव्ही मंगलममधून 15 क्रू सदस्यांची सुटका केली आहे. घटना आजची म्हणजे म्हणजे 17 जूनची आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रेवदांडा बंदराजवळ असलेल्या बुडणाऱ्या एमव्ही मंगलममधून 15 क्रू सदस्यांची सुटका करण्यात आली आहे.

Follow us on

महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात खराब हवामान आणि समुद्राच्या खडकाळ परिस्थितीत बचावकार्य चालू असून, आयसीजी हेलिकॉप्टरने एमव्ही मंगलममधून 15 क्रू सदस्यांची सुटका केली आहे. घटना आजची म्हणजे म्हणजे 17 जूनची आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रेवदांडा बंदराजवळ असलेल्या बुडणाऱ्या एमव्ही मंगलममधून 15 क्रू सदस्यांची सुटका करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच एमआरसीसी मुंबईने बचावकार्य सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. आयसीजी पोत सुभद्रा कुमारी चौहान सकाळी 8 वाजता मुरुड जंजिरा येथून निघून सदर परिसरात पोहोचल्या. त्याचबरोबर दमण येथून 02 हेलिकॉप्टर देखील येथे हजर झाले होते आणि या ठिकाणाहून 15 खलाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.