बीडच्या निवडणुकीतील विजयाचं श्रेय पंकजा मुंडे यांचे आहे, असे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) म्हणाले आहेत. पंचायत निवडणुकीचे निकाल म्हणजे बीड (Beed) जिल्ह्यातल्या लोकांनी भविष्यकाळातील सत्ता कोणाकडे असणार हे प्रत्यक्षरित्या सांगितले असल्याचं मत भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मांडलंय. या निवडणुकीत यश मिळवण्यात सत्ताधारी कमी पडले. राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपा(BJP)ला बहुमत मिळत असल्याचं स्पष्ट होतंय, असंही त्या यावेळी म्हणाल्या. सत्ताधाऱ्यांच्या कामकाजाला लोक नाकारत आहेत, असी टीका त्यांनी केली.