सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काल औरंगाबादमध्ये माईक मिळाल्यावर भान राहील नाही. अतिशय बकवास भाषण झालं अशी खरमरीत टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. सिंधुदुर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. औरंगाबाद सभेतील मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा समाचार घेण्याचा प्रयत्न राणेंनी या पत्रकार परिषदेत केला.