अहमदनगर : औरंगाबद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर केलं जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यांनी ही घोषणा चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर यांची जयंतीच्या कार्यक्रमात केली. यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मोठं विधान केलं. त्यांनी या निर्णयाचे स्वागत करताना मुख्यमंत्री शिंदे यांचे अभिनंदन केलं. तसेच याची मागणी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली होती. ती मान्य झाली. तर मला वाटतं की मुख्यमंत्री शिंदे यांच्या नशीबात होतं हे. आतापर्यंत अशी घोषणा कोणीच केली नाही. त्यामुळे मी त्याचं कौतुक करते.