मुंबई: “चंद्रकांत पाटील यांना काही उद्योग राहिलाय असे वाटत नाही. नगरपंचायत निवडणुकीचे जे निकाल आले, भाजपाची पिछेहाट झाली. त्याने ते व्यथित आहेत. प्रदेशाध्यक्ष म्हणून ते अपयशी ठरले, भाजपमधले ते अपयशी नेते आहेत” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली.