2010मध्ये महत्त्वाच्या नेत्यांनी ओबीसी (OBC) जनगणना करा, अशी मागणी केली होती. प्रणब मुखर्जीं(Pranab Mukherjee)नी त्याला परवानगीही दिली होती. त्याप्रमाणे जणगणना केली गेली. 2016मध्ये मोदी सरकारकडे तो रिपोर्ट गेला. मात्र त्यावर काहीही करण्यात आले नाही. आता भाजपाचे नेते खोटे बोलत असल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी केला आहे. ओबीसी आरक्षणावरून त्यांनी भाजपाला लक्ष्य केले.